शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:23 IST

मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

ठळक मुद्देमुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्दजनशताब्दी, तेजस एक्सप्रेस रद्द; तुतारी १४ तास उशिरा

रत्नागिरी : मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली एक्सप्रेस व दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. बुधवारच्या मुंबईतून सुटणाऱ्या तेजस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी तुतारी एक्सप्रेस तब्बल १४ तास उशिराने धावत होती.१९७४ नंतर मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई शहर पावसाच्या पाण्यात असल्यासारखी स्थिती आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाºया अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुंबई शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणीच पाणी झाले. लोकल रेल्वेसेवाही मंगळवारी दुपारपर्यंत कोलमडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया तीन गाड्या रद्द मंगळवारी रद्द करण्यात आल्या.मुंबईत कोकण रेल्वे मार्गावरील अन्य गाड्याही नेता येत नसल्याने त्या मंगळवारी दुपारपर्यंत पनवेलला थांबविल्या जात होत्या. दुपारनंतर या गाड्यांची वाहतूक मुंबईतून सुरू झाली. १ जुलैची रेल्वे क्र.१२६२० मंगलूरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्र्यंतच धावली. १२६१९ क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारनंतर मंगलूरू येथे रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारी १ ते १४ तास उशिराने धावत होत्या.१६३३४ वेरावळ एक्सप्रेस पावणेदोन तास उशिराने धावत होती. १२४५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस तीन तास उशिराने धावत होती.१९४२४ हमसफर गाडी ६ तास, २२६५४ निझामुद्दीन त्रिवेंद्रम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ६ तास, ५०१०५ दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी दीड तास उशिराने धावत होती.अतिवृष्टीने मुंबईकरांचे हाल बेहाल झालेले असतानाच कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी क्र.११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या माहितीनुसार तब्बल १४ तास उशिराने धावत होती. ही गाडी त्यावेळी कोलाड येथून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. या गाडीला उशिर झाल्याने ताटकळत बसलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याने व मुंबईत पाणी तुंबल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही गजबजलेल्या रत्नागिरी स्थानकातही शुकशुकाट होता. प्रवासात अडकायला नको म्हणून अनेकांनी उशिराने धावत असलेल्या गाड्यांनी जाणे टाळले. चार महत्वाच्या गाड्या रद्द झाल्याने सर्वच प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी