शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:23 IST

मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

ठळक मुद्देमुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्दजनशताब्दी, तेजस एक्सप्रेस रद्द; तुतारी १४ तास उशिरा

रत्नागिरी : मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली एक्सप्रेस व दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. बुधवारच्या मुंबईतून सुटणाऱ्या तेजस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी तुतारी एक्सप्रेस तब्बल १४ तास उशिराने धावत होती.१९७४ नंतर मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई शहर पावसाच्या पाण्यात असल्यासारखी स्थिती आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाºया अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुंबई शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणीच पाणी झाले. लोकल रेल्वेसेवाही मंगळवारी दुपारपर्यंत कोलमडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया तीन गाड्या रद्द मंगळवारी रद्द करण्यात आल्या.मुंबईत कोकण रेल्वे मार्गावरील अन्य गाड्याही नेता येत नसल्याने त्या मंगळवारी दुपारपर्यंत पनवेलला थांबविल्या जात होत्या. दुपारनंतर या गाड्यांची वाहतूक मुंबईतून सुरू झाली. १ जुलैची रेल्वे क्र.१२६२० मंगलूरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्र्यंतच धावली. १२६१९ क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारनंतर मंगलूरू येथे रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारी १ ते १४ तास उशिराने धावत होत्या.१६३३४ वेरावळ एक्सप्रेस पावणेदोन तास उशिराने धावत होती. १२४५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस तीन तास उशिराने धावत होती.१९४२४ हमसफर गाडी ६ तास, २२६५४ निझामुद्दीन त्रिवेंद्रम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ६ तास, ५०१०५ दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी दीड तास उशिराने धावत होती.अतिवृष्टीने मुंबईकरांचे हाल बेहाल झालेले असतानाच कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी क्र.११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या माहितीनुसार तब्बल १४ तास उशिराने धावत होती. ही गाडी त्यावेळी कोलाड येथून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. या गाडीला उशिर झाल्याने ताटकळत बसलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याने व मुंबईत पाणी तुंबल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही गजबजलेल्या रत्नागिरी स्थानकातही शुकशुकाट होता. प्रवासात अडकायला नको म्हणून अनेकांनी उशिराने धावत असलेल्या गाड्यांनी जाणे टाळले. चार महत्वाच्या गाड्या रद्द झाल्याने सर्वच प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी