शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा १५ मीटर रुंदीचाच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:52 IST

३० मीटर रूंदीच्या जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने पेच

आॅनलाईन लोकमतपाली (जि. रत्नागिरी), दि. २२ : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादित होणाऱ्या मालमत्ता व इतर संसाधनाच्या मोबदला वाटपाचे रत्नागिरी तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील व नागरी वस्तीही विस्थापित होणाऱ्या पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारक प्रकल्पबाधितांसमोर सध्या यापूर्वी भूसंपादित न झालेल्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूच्या १५ मीटर असे एकूण ३० मीटर रूंदीचा जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने फक्त ७.५ मीटर संपादित भूखंडाचा मोबदला मिळणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.मुंबई - गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग असताना एक गाडी जाईल इतकाच रुंद होता. पुढे त्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व आता आशियाई महामार्गात रुपांतर झाले आहे. मात्र, पहिल्यांदा पाली बाजारपेठ येथे १९८४-८५ला ग्रामस्थांच्या तोंडी संमतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या जुन्या रस्त्याचे रुंदीकरण केले.

त्यानंतर पुढे २००० - ०१ला पुन्हा काही मीटरने हाच महामार्ग जुन्याच पद्धतीने तोंडी संमतीवर रुंद केला. त्यावेळी या बाजारपेठेतील अनेकांना या रुंदीकरणामध्ये आपली दुकाने रुंदीकरणासाठी तोडावी लागली होती. तरीही त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुढे मोठे रुंदीकरण होणार नाही फक्त एकदाच सहकार्य करा, असे सांगितले होते. त्यामुळे कोणी विरोध केला नव्हता. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जमीनमालकांना या दोन्हीही महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी कोणताही मोबदला भूसंपादनाबाबत दिलेला नव्हता. त्यातच आता प्रस्तावित महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील जमीन संपादित होताना दुतर्फा फक्त ७.५ मीटरचाच मोबदला भरपाई मिळणार आहे.

यापूर्वी येथील जमीनधारकाना भूसंपादन मोबदला दिल्याच्या महसूल व भूमी अभिलेख विभागाकडे दस्तऐवजामध्ये कोणत्याही नोंदीचा उल्लेख नसतानाही त्या जमिनीचा मोबदला देण्याचे शासन नाव घेत नसल्याने प्रकल्पबाधितांमध्ये चीड आहे. तसेच येथील अनेकांचे भूखंड हे अवघ्या २ ते ३ गुंठे एवढ्या कमी क्षेत्रफळाचे असून, ते बहुतांश ठिकाणी संपूर्णत: संपादित होत असल्याने त्यातील फक्त ७.५ मीटर भागाच्या संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.

महामार्गाची नुकसान भरपाई देताना किमान पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारकांचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तरी मोबदला वाटप करण्यापूर्वी नव्याने सध्याच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून संपादित होणाऱ्या दुतर्फा २२.५ मीटर रुंद म्हणजे एकूण ४५ मीटर रुंदीचे भूखंडाचे मूल्यांकन करुन तसा मोबदला संपूर्ण भूखंडाचा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील ३० मीटर रुंदीचे संपादन करताना मोबदला प्रत्यक्षात न दिलेल्या जमिनीवरून वातावरण तापण्याची शक्यता दिसत आहे.