शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा १५ मीटर रुंदीचाच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:52 IST

३० मीटर रूंदीच्या जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने पेच

आॅनलाईन लोकमतपाली (जि. रत्नागिरी), दि. २२ : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादित होणाऱ्या मालमत्ता व इतर संसाधनाच्या मोबदला वाटपाचे रत्नागिरी तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील व नागरी वस्तीही विस्थापित होणाऱ्या पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारक प्रकल्पबाधितांसमोर सध्या यापूर्वी भूसंपादित न झालेल्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूच्या १५ मीटर असे एकूण ३० मीटर रूंदीचा जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने फक्त ७.५ मीटर संपादित भूखंडाचा मोबदला मिळणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.मुंबई - गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग असताना एक गाडी जाईल इतकाच रुंद होता. पुढे त्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व आता आशियाई महामार्गात रुपांतर झाले आहे. मात्र, पहिल्यांदा पाली बाजारपेठ येथे १९८४-८५ला ग्रामस्थांच्या तोंडी संमतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या जुन्या रस्त्याचे रुंदीकरण केले.

त्यानंतर पुढे २००० - ०१ला पुन्हा काही मीटरने हाच महामार्ग जुन्याच पद्धतीने तोंडी संमतीवर रुंद केला. त्यावेळी या बाजारपेठेतील अनेकांना या रुंदीकरणामध्ये आपली दुकाने रुंदीकरणासाठी तोडावी लागली होती. तरीही त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुढे मोठे रुंदीकरण होणार नाही फक्त एकदाच सहकार्य करा, असे सांगितले होते. त्यामुळे कोणी विरोध केला नव्हता. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जमीनमालकांना या दोन्हीही महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी कोणताही मोबदला भूसंपादनाबाबत दिलेला नव्हता. त्यातच आता प्रस्तावित महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील जमीन संपादित होताना दुतर्फा फक्त ७.५ मीटरचाच मोबदला भरपाई मिळणार आहे.

यापूर्वी येथील जमीनधारकाना भूसंपादन मोबदला दिल्याच्या महसूल व भूमी अभिलेख विभागाकडे दस्तऐवजामध्ये कोणत्याही नोंदीचा उल्लेख नसतानाही त्या जमिनीचा मोबदला देण्याचे शासन नाव घेत नसल्याने प्रकल्पबाधितांमध्ये चीड आहे. तसेच येथील अनेकांचे भूखंड हे अवघ्या २ ते ३ गुंठे एवढ्या कमी क्षेत्रफळाचे असून, ते बहुतांश ठिकाणी संपूर्णत: संपादित होत असल्याने त्यातील फक्त ७.५ मीटर भागाच्या संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.

महामार्गाची नुकसान भरपाई देताना किमान पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारकांचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तरी मोबदला वाटप करण्यापूर्वी नव्याने सध्याच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून संपादित होणाऱ्या दुतर्फा २२.५ मीटर रुंद म्हणजे एकूण ४५ मीटर रुंदीचे भूखंडाचे मूल्यांकन करुन तसा मोबदला संपूर्ण भूखंडाचा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील ३० मीटर रुंदीचे संपादन करताना मोबदला प्रत्यक्षात न दिलेल्या जमिनीवरून वातावरण तापण्याची शक्यता दिसत आहे.