शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाटळमध्ये गाळाने कोंडलेली नदी झाली मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नदी पुनर्जीवन मोहिमेचे काम अतिशय उल्लेखनीय झाले आहे. सिंधुदुर्गातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नदी पुनर्जीवन मोहिमेचे काम अतिशय उल्लेखनीय झाले आहे. सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील नाटळ येथील ग्रामस्थांच्या एकीतून अनेक वर्षांपासून गाळाने कोंडलेली नदी नाम फाउंडेशन आणि नाटळ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून मुक्त झाली आहे. नदीची खोली वाढविल्याने यंदा पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले तरीही सर्वांचीच शेती सुरक्षित राहिली, ही मोठी उपलब्धी या पाणी चळवळीची आहे.

दोन-अडीच वर्षांपूर्वी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत आणि मंडळाचे पदाधिकारी सर्वेक्षण केले असता त्यांना नदी दगडामुळे होरली असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने अनेकांच्या शेतीत पाणी जाऊन मोठेच नुकसान होत असे. पाऊस कितीही पडला तरी पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणीटंचाईचा सामना दरवर्षीच करावा लागत असे. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पुराने गावाचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे भविष्यात असं घडण्याआधीच उपाययोजना करायला हवी, या जाणिवेतून मुंबईकर चाकरमानी आणि गावकरी एकत्र आले. यासाठी मुंबईत बैठका झाल्या. नदी पुनर्जीवन करण्याचा निर्धार झाला. मुंबईतील रामेश्वर माऊली ग्रामस्थांच्या पुढाकाराने कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या उपस्थितीत त्यांच्याच कार्यालयात बैठका झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नामचे जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांचे नाव पुढे आले. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांचे मित्र राजू परुळेकर यांनीही नाम फाउंडेशनचे नाव सुचवले आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक असलेल्या नाना पाटेकर यांचा नंबरही दिला. या व्हाॅट्सॲप नंबरवर सावंत यांनी केवळ मेसेज पाठवताच तासाभरात मुंबईचे राजीव सावंत आणि पुण्याचे अभियंता गणेश थोरात यांनी संपर्क केला.अखेर नदी पुनर्जीवन करण्याच्या मोहिमेला नाम फाउंडेशनची साथ मिळाली. मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लघु पाटबंधारे आणि जिल्हाधिकारी यांच्यासह आवश्यक ती परवानगी मिळविली. नामने ३ पोकलेन मशीन देऊ केल्या.

अखेर २१ एप्रिल २०१९ रोजी प्रत्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते नदीचे पुनर्जीवन आणि खोलीकरण कामाचे उद्घाटन झाले. नाना पाटेकर गावात आल्याने गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या श्रमदानाने अगदी १६ - १६ तास काम सुरू झाले. सुमारे २० ते २५ लाखांचा निधी नाटळच्या मुंबईकर आणि इथल्या गावकऱ्यांनी उभा केला आणि सुमारे सव्वा महिना भारल्यासारखे काम करत ही जलक्रांती केली. या पावसाळ्यात नदीला पाणी प्रचंड प्रमाणात आले होते; मात्र ग्रामस्थांच्या कामामुळे शेतात पाणी शिरले नाही.

जलपुरुषाचा पदस्पर्श...

१७ ऑगस्ट २०१८ नाटळ गावासाठी सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा होता. जलपुरुष, रँमन मेगसेसे पुरस्कार, स्टॉक होम वॉटर प्राईझ पुरस्कारप्राप्त डॉ.राजेंद्र सिंह यांनी नाटळ गावात नदी पाहणीसाठी भेट देऊन पाहणी केली होती. त्या प्रेरणेतूनच पुढे नाटळ ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित चाकरमानी यांच्या सहभागाने झालेले नदी पुनर्जीवनाचे काम केवळ गाव पातळीवरच नव्हे तर तालुका आणि जिल्हा पातळीवर चर्चेत आले.

पाणी अडवा...पाणी जिरवा मंत्र

पावसाळ्यात नदीतील गाळ व दगड गोठे वापरून प्लास्टिक कागद आच्छादून तब्बल १५ बंधारे नाटळ ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बांधले आहेत. त्यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. परिणामी, विहिरींंचे पाणी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे पाणी टंचाईवरही या ग्रामस्थांनी मात केली.