शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

मुसळ्याचा धबधबा अद्याप दुर्लक्षित

By admin | Updated: December 9, 2014 23:16 IST

राजकीय अनास्था : पर्यटन विकासाला पोषक वातावरण असूनही दुर्लक्ष...

पाचल : कोकणात येणाऱ्या पर्यटकांना खुणावतोय काजिर्डा गावचा मुसळ्याचा धबधबा. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे या पर्यटनस्थळाचा विकास होऊ शकला नाही. राजकीय अनास्थेमुळे या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळाला फटका बसला आहे. सह्याद्रीच्या कुशीत नयनरम्य शांत वातावरणात सतत ओसंडून वाहणारा मुसळ्याचा धबधबा दुर्लक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.राजापूर तालुक्याच्या जामदा खोऱ्यात काजिर्डे गावी वाहात असलेला हा धबधबा काजिर्डा गावाला लाभलेली नैसर्गिक देणगीच आहे. मात्र, या आणि अशा नैसर्गिक देणग्यांकडे कुणीही लक्ष देत नसल्याने रोजगाराचे साधन उपलब्ध असतानासुद्धा सर्वच स्तरावरील अनास्थेमुळे उपलब्ध होऊ शकत नाही.दाट हिरवळवगळता याच परिसरात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात पडून आहे. मात्र, या पडीक जमिनीचा उपभोग होतानाही दिसत नाही. सपाट जमिनीवर थोड्या फार प्रमाणात उसाची तसेच भाजीपाल्याची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. धबधब्याच्या पायथ्याकडचा भाग शेकडो हेक्टर ओलिताखाली व लागवडीखाली येऊ शकतो. दुर्गम भागात असणाऱ्या काजिर्डा गावच्या ग्रामस्थांना खरे तर कृषी खात्याने मार्गदर्शन केल्यास त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊ शकते. कृषी खात्याने संबंधित योजनेपासून शेतकऱ्यांना दूरच ठेवले आहे.जामदा प्रकल्पाचा लाभ क्षेत्राच्या बाहेर शेकडो एकर जमीन पडीक राहिल्याने भविष्यात या जमिनीवर शासकीय प्रकल्पाचे नियोजन न झाल्यास ही शेकडो एकर जमीन जमीनमाफियांच्या घशात जायला वेळ लागणार नाही. कारण जामदा व अर्जुना प्रकल्प घोषित झाल्यापासून या परिसरात ज्यांची नावे आजवर कधी कानावर आली नाहीत, अशांची नावे सध्या ऐकायला मिळत आहेत. पर्यटनाला वाव असणाऱ्या धबधब्याच्या जोडीला भविष्यात होणारे जामदा धरण म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम जडणघडणीचा अनोखा संगम आहे, त्याचा विकास व्हावा, हीच जनतेची अपेक्षा आहे. (वार्ताहर)