शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुसळ्याचा धबधबा अद्याप दुर्लक्षित

By admin | Updated: December 9, 2014 23:16 IST

राजकीय अनास्था : पर्यटन विकासाला पोषक वातावरण असूनही दुर्लक्ष...

पाचल : कोकणात येणाऱ्या पर्यटकांना खुणावतोय काजिर्डा गावचा मुसळ्याचा धबधबा. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे या पर्यटनस्थळाचा विकास होऊ शकला नाही. राजकीय अनास्थेमुळे या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळाला फटका बसला आहे. सह्याद्रीच्या कुशीत नयनरम्य शांत वातावरणात सतत ओसंडून वाहणारा मुसळ्याचा धबधबा दुर्लक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.राजापूर तालुक्याच्या जामदा खोऱ्यात काजिर्डे गावी वाहात असलेला हा धबधबा काजिर्डा गावाला लाभलेली नैसर्गिक देणगीच आहे. मात्र, या आणि अशा नैसर्गिक देणग्यांकडे कुणीही लक्ष देत नसल्याने रोजगाराचे साधन उपलब्ध असतानासुद्धा सर्वच स्तरावरील अनास्थेमुळे उपलब्ध होऊ शकत नाही.दाट हिरवळवगळता याच परिसरात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात पडून आहे. मात्र, या पडीक जमिनीचा उपभोग होतानाही दिसत नाही. सपाट जमिनीवर थोड्या फार प्रमाणात उसाची तसेच भाजीपाल्याची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. धबधब्याच्या पायथ्याकडचा भाग शेकडो हेक्टर ओलिताखाली व लागवडीखाली येऊ शकतो. दुर्गम भागात असणाऱ्या काजिर्डा गावच्या ग्रामस्थांना खरे तर कृषी खात्याने मार्गदर्शन केल्यास त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊ शकते. कृषी खात्याने संबंधित योजनेपासून शेतकऱ्यांना दूरच ठेवले आहे.जामदा प्रकल्पाचा लाभ क्षेत्राच्या बाहेर शेकडो एकर जमीन पडीक राहिल्याने भविष्यात या जमिनीवर शासकीय प्रकल्पाचे नियोजन न झाल्यास ही शेकडो एकर जमीन जमीनमाफियांच्या घशात जायला वेळ लागणार नाही. कारण जामदा व अर्जुना प्रकल्प घोषित झाल्यापासून या परिसरात ज्यांची नावे आजवर कधी कानावर आली नाहीत, अशांची नावे सध्या ऐकायला मिळत आहेत. पर्यटनाला वाव असणाऱ्या धबधब्याच्या जोडीला भविष्यात होणारे जामदा धरण म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम जडणघडणीचा अनोखा संगम आहे, त्याचा विकास व्हावा, हीच जनतेची अपेक्षा आहे. (वार्ताहर)