शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

महावितरणच्या ‘शेलार मामांनी’ जिंकली वादळाची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे वय, तरीही झुंजायची जिद्द एकाेणीस वर्षांची. ‘अशी लै वादळ पाहिली’ असे म्हणत वादळाशी झुंज ...

रत्नागिरी : निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे वय, तरीही झुंजायची जिद्द एकाेणीस वर्षांची. ‘अशी लै वादळ पाहिली’ असे म्हणत वादळाशी झुंज देण्यासाठी ते सज्ज झाले. वादळ, पाऊस यांचा मारा झेलत ‘शेलार मामांच्या’ आवेशात ते विद्युत खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत हाेते. तरुणांनाही लाजवेल असा हा त्यांचा उत्साह पाहून नवखेही उत्साहाने कामाला लागले आणि वादळाशी झुंज देत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यशही मिळविले. या वादळाशी झुंज देणाऱ्या महावितरणमधील हरिश्चंद्र भिकाजी निंगवले अर्थात निंगवले मामांच्या धाडसाचे काैतुक हाेत असून, ते महावितरणचे ‘शेलार मामाच’ ठरले आहेत.

कोकण किनारपट्टीवर ताैक्ते चक्रीवादळ धडकले आणि सर्वाधिक फटका बसला ताे महावितरणच्या यंत्रणेला. प्रत्येक गावात, वाडीत वादळामुळे पडलेली झाडे, त्यामुळे मोडलेले विजेचे खांब, तुटलेल्या तारा हे चित्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दिसत होते; पण वादळाचा जोर कमी होताच वीज कामगार आणि अभियंते सर्वप्रथम कामाला लागले. नव्याने भरती झालेले, मध्यमवयीन आणि अनुभवाने शहाणे पण निवृत्तीला पोहाेचलेले वीज कामगार भर पावसात भिजत कामाला लागले. त्यातील एक निंगवले मामा.

खंडाळा शाखेत कार्यरत असणाऱ्या निंगवले मामाचे वय झाले एकोणसाठ, पण झुंजायची जिद्द एकोणीस वर्षांची. अशी लै वादळं पहिली म्हणून वारा जरा ओसरताच आपल्या भागातील वीज कामगारांची फौज घेऊन ते या नवीन लढाईला ‘शेलार मामांच्या’ आवेशाने कामाला लागले. स्वतः निंगवले मामा भर पावसात कामाला लागले. ज्या ठिकाणी गरज पडली, त्या ठिकाणी खांबावर चढून दुरुस्ती केली आणि मग पुढे पुढे जात काम करीत राहिले. खंडाळा परिसरातील सुतारवाडी, मिरवणे, वडवली, शिर्केवाडी, परटवणे अशा परिसरातील घरांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. घरातील पुन्हा एकदा दिवा पेटविणाऱ्या ध्येयनिष्ठ निंगवले मामांना नागरिक आता तर महावितरणचे ‘शेलार मामा’ म्हणू लागले आहेत. या आणि अशाच महावितरणच्या गावोगावी काम करणाऱ्या अनेक ध्येयवेड्या अभियंते व कामगारांमुळे दुर्गम भागातील वीज ग्राहकांना आधार वाटतो.

---------------------------------

विद्युत पुरवठा सुरळीत हाेण्यासाठी भर पावसात वीज खांबावर चढून निंगवले मामांनी काम केले.