शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कामांना महावितरणचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

रत्नागिरी : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची ...

रत्नागिरी : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. तशा सूचना कोकण परिमंडलातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोकण भौगोलिकदृष्ट्या जंगल, डोंगर, दऱ्या यामध्ये वसलेला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे प्रत्येक वीज वाहिनीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर येणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना सर्व शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साधन सामग्री वायर्स, इन्स्युलेटर, आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबाबत सर्व विभागीय कार्यालयाने वेळीच दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

गतवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात वीज वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले होते; परंतु महावितरण कंपनीने खंबीर पावले उचलून बाधित यंत्रणा रेकॉर्ड ब्रेक कालावधीत पुन्हा उभी केली होती. निसर्ग चक्रीवादळ, फयान वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वीज यंत्रणेला कामाचाही मोठा अनुभव मिळाला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात किरकोळ घटना वगळता वीज पुरवठा सुरू राहील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे.

रत्नागिरी शहराला अखंडित वीजपुरवठा राहावा, यासाठी २२० किलोवॅट वाहिनीचे निवळी ते कुवारबाव दुपदरीकरण करण्याचे काम महापारेषण कंपनी लवकरच पूर्ण करणार आहे. यामुळे शहरासाठी भविष्यात पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीन पर्याय उपलब्ध राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड (मंडणगड), शिवणे (गुहागर), ओणी (राजापूर) आणि साडवली (संगमेश्वर), आदी नव्याने बांधलेली विद्युत उपकेंद्रे आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक दर्जेदार व अखंडित सुरू राहणार आहे.

गावखडी ते पावस अशी स्वतंत्र नवीन पर्यायी वाहिनी कार्यरत झाल्याने त्या परिसरातील पावसाळी वीज पुरवठा अखंडित सुरू राहणार आहे. रत्नागिरी शहरातील भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळी आणि वादळी हवामानातही सातत्यपूर्ण, सुरक्षित वीज पुरवठा सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाहिन्यांवर झुकलेली झाडे, फांद्या यांची वेळीच साफसफाई करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटणे, त्यामुळे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे.

....................

कोकण परिमंडलांतर्गत मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी महावितरण कंपनीची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या कामकाजासाठी काही काळ वीज पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्ती कामासाठी वीज ग्राहकांनीही सहकार्य करावे.

- देवेंद्र सायनेकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल, रत्नागिरी.