शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

महावितरणला ग्राहकांचा ठेंगा, थकबाकी जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 15:53 IST

mahavitaran Ratnagiri-लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात ३४ कोटींची थकबाकीकारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निरुत्साह दाखविल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ३४ कोटी ६६ लाख वीज थकबाकी शिल्लक राहिली आहे. या थकबाकीमुळे आता कारवाईच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना एके कोरोना व्यापून राहिला आहे आणि सर्वांचेच स्वत:च्या घरात राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. घरी राहणाऱ्या मंडळींना अगदी बाधित झालेल्या परिसरात जीवाची बाजी लावत वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अविरत वीजपुरवठा सुरू ठेवला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर महावितरण कंपनीने वीज देयके देण्यास सुरुवात केली. परंतु वीज ग्राहकांच्या अडचणींचा विचार करून व एकूणच वीजवापर बराच वाढला असल्याने वीजपुरवठा खंडित न करता हप्त्याने बिल भरण्याची सवलत देण्याचा निर्णय शासनाने आणि महावितरण कंपनीने घेतला होता. सप्टेंबर २०२० पासून सगळ्या वीज ग्राहकांना हप्ते पद्धतीने वीजबिल भरणा करण्याची विनंती केली होती.परंतु, वीज ग्राहकांनी हप्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सातत्याने वाढत राहिली होती.ऊर्जामंत्र्यांनी १० मार्च रोजी थकबाकीदारांचा पुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे केवळ २० दिवसांत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्लेही करण्यात आले होते. यामुळे थकबाकी वसूल होईल, याची अपेक्षा होती. परंतु, ३१ मार्चअखेर वीज ग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखविल्याचे दिसत आहे.मोहीम सुरूच राहणारएकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९५,८२८ ग्राहकांची ३४ कोटी ६६ लाख रुपये एवढी थकबाकी शिल्लक आहे. ३१ मार्च संपला तरीही ही थकबाकी वसूल झाली नसल्याने आता कोणती कारवाई होणार, या चिंतेत कर्मचारी पडले आहेत. यामुळेच पूर्ण थकबाकी वसूल होईपर्यंत आता ही मोहीम थांबविली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.वीज तोडण्याचा निर्णयवाढत्या थकबाकीमुळे एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय १० मार्चपासून ऊर्जामंत्र्यांना घ्यावा लागला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी