शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

महावितरणची दीड लाख ग्राहकांकडे ५२ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

रत्नागिरी : मे महिन्यात झालेल्या ताैक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची यंत्रणाच कोलमडल्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. महावितरणच्या अधिकारी, ...

रत्नागिरी : मे महिन्यात झालेल्या ताैक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची यंत्रणाच कोलमडल्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झाला. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भर पावसात जोखीम घेत वीज पुरवठा सुरळीत केला. यानंतर वीज कामगारांचे कौतुक, सत्कार करण्यात आले. एकीकडे महावितरणचे कौतुक करण्यात येत असले तरी वीजबिले वेळेवर भरली जात नसल्यामुळे थकबाकी मात्र वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६० हजार ९०३ ग्राहकांकडे ५२ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे.

कोरोना काळातही महावितरण कंपनी अविरत वीज पुरवठा करत आहे. सर्व रूग्णालये, विलगीकरण केंद्र तसेच घरांमधील मीटर रिडिंग घेणे कठीण असूनही मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. ऑनलाईन अ‍ॅप, एसएमएसद्वारे रिडिंग स्वत: अपलोड करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून विजेच्या वापराप्रमाणे अचूक वीज देयके मिळू शकतील. मे महिना अखेरीस ग्राहकांना वीज देयके वितरीत करण्यात आली होती. मात्र, मे महिना अखेरीस खेड विभागातील ४० हजार ६६९ ग्राहकांकडे १३ कोटी ५३ लाख, चिपळूण विभागातील ३९ हजार ९७ ग्राहकांकडे १३ कोटी ९४ लाख, तसेच रत्नागिरी विभागातील ८१ हजार १३७ ग्राहकांकडे २५ कोटी तीन लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील एकूण एक लाख ६० हजार ९०३ ग्राहकांकडे ५२ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे.

गतवर्षी निसर्ग, यावर्षी ताैक्ते या दोन्ही वादळांमुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. तरीही ग्राहकांसाठी वीज पुरवठा जोखीम घेत पूर्ववत करण्यात आला. ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल अ‍ॅप तसेच ऑनलाईन पध्दतीने वीज देयके भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने घराबाहेर न पडता बिल भरणे सहज सुलभ होत आहे.

---------------------------

तक्रारी प्रलंबित राहू नयेत

वीज मीटर बंद पडल्याने किंवा अन्य कुठल्याही कारणाने वीज मीटरबाबत तक्रार असल्यास महावितरणकडे ग्राहकांनी संपर्क साधावा. सध्या पुरेसे मीटर जिल्ह्यात महावितरण कंपनीने उपलब्ध करून ठेवले आहेत. यामुळे ग्राहकांच्या मीटरसंबंधी तक्रारी प्रलंबित राहू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

------------------------

लॉकडाऊन काळातही वीजबिले ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा वापर करून प्रत्यक्ष, ऑनलाईन, मोबाईल अ‍ॅपव्दारे वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ