शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणूक आल्यावर मनसेचे सेटींग सुरू, खासदार विनायक राऊत यांचा आरोप

By मनोज मुळ्ये | Updated: March 20, 2024 17:12 IST

रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेसह भाजपवरही टीका केली. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर आपला सदस्य निवडून यावा, अशी मनसे प्रमुखांची मानसिकता आतापर्यंत कधीही दिसलेली नाही.

रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता भाजपकडे गेले आहेत. पण या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केली.

रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेसह भाजपवरही टीका केली. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर आपला सदस्य निवडून यावा, अशी मनसे प्रमुखांची मानसिकता आतापर्यंत कधीही दिसलेली नाही. निवडणूक आली की ते कोणा ना कोणासोबत सेटींग करतात. केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष करुन त्यांना टक्कर देण्यासाठीच ते भाजपसोबत गेले आहेत. पण लोक त्यांना ओळखून आहेत आणि या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपला आता कसलीच गॅरेंटी वाटत नसल्याने ते इकडच्या तिकडच्या लोकांना गोळा करुन आपली पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीमधील जागा वाटप अंतिम होत आले आहे. केवळ एकदोन जागांबाबतच चर्चा सुरू आहे. बाकी जागा निश्चित झाल्या आहेत. त्यात कोणतीही अडचण नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.