शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

फुरुस येथे डोंगर खचला

By admin | Updated: August 5, 2014 00:10 IST

ग्रामस्थ भयभीत : अनेक ठिकाणी पडझड; दिवसभर पावसाची संततधार

चिपळूण : तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. फुरुस येथे डोंगराचा काही भाग खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसीलदार वृषाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ‘माळीण’ प्रकरण अद्याप ताजे असतानाच फुरुस-कदमवाडीजवळ असलेल्या डोंगराचा काही भाग खचल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कदमवाडीपासून १ कि.मी. अंतरावर २००५ मध्ये डोंगर खचला होता. याच डोंगराचा काही भाग आज खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या डोंगरावर पूर्ण जंगल आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच तहसीलदार वृषाली पाटील, मंडल अधिकारी एम. व्ही. मिसाळ, तलाठी डी. एस. सरगर-माने यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली.सध्यातरी घाबरण्यासारखी स्थिती नाही. परंतु, कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तेथे असणाऱ्या १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही घरे नवीन आहेत.रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी घरात न झोपता गावात इतर ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे रहावे, असे सूचविण्यात आले आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, या भागाची भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येईल, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले. सकाळी १० नंतर पावसाची संततधार सुरू झाली. ती दिवसभर सुरूच होती. पावसामुळे दहिवली खुर्द गावी मनोहर सोमा चव्हाण यांचे घर कोसळून २२ हजार ६०० तर अन्नधान्याचे १२०० रुपये असे एकूण ३४ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. याच गावातील बाबल्या बाळ्या नागले याचा गोठा कोसळून १० हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव येथे शंकर भिकाजी शिंदे यांच्या घराचे पत्रे उडून १५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ व महसूल खात्यातर्फे दरडी कोसळणारी ठिकाणे व पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. शासकीय यंत्रणा कोणताही धोका होऊ नये, यासाठी सतर्क आहे. (प्रतिनिधी)--डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या १२ नवीन बांधलेल्या घरांना स्थलांतराच्या नोटीस --भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करणार पाहणी, तहसीलदार वृषाली पाटील यांनी केली पाहणी