शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

फुरुस येथे डोंगर खचला

By admin | Updated: August 5, 2014 00:10 IST

ग्रामस्थ भयभीत : अनेक ठिकाणी पडझड; दिवसभर पावसाची संततधार

चिपळूण : तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. फुरुस येथे डोंगराचा काही भाग खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसीलदार वृषाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ‘माळीण’ प्रकरण अद्याप ताजे असतानाच फुरुस-कदमवाडीजवळ असलेल्या डोंगराचा काही भाग खचल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कदमवाडीपासून १ कि.मी. अंतरावर २००५ मध्ये डोंगर खचला होता. याच डोंगराचा काही भाग आज खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या डोंगरावर पूर्ण जंगल आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच तहसीलदार वृषाली पाटील, मंडल अधिकारी एम. व्ही. मिसाळ, तलाठी डी. एस. सरगर-माने यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली.सध्यातरी घाबरण्यासारखी स्थिती नाही. परंतु, कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तेथे असणाऱ्या १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही घरे नवीन आहेत.रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी घरात न झोपता गावात इतर ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे रहावे, असे सूचविण्यात आले आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, या भागाची भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येईल, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले. सकाळी १० नंतर पावसाची संततधार सुरू झाली. ती दिवसभर सुरूच होती. पावसामुळे दहिवली खुर्द गावी मनोहर सोमा चव्हाण यांचे घर कोसळून २२ हजार ६०० तर अन्नधान्याचे १२०० रुपये असे एकूण ३४ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. याच गावातील बाबल्या बाळ्या नागले याचा गोठा कोसळून १० हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव येथे शंकर भिकाजी शिंदे यांच्या घराचे पत्रे उडून १५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ व महसूल खात्यातर्फे दरडी कोसळणारी ठिकाणे व पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. शासकीय यंत्रणा कोणताही धोका होऊ नये, यासाठी सतर्क आहे. (प्रतिनिधी)--डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या १२ नवीन बांधलेल्या घरांना स्थलांतराच्या नोटीस --भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करणार पाहणी, तहसीलदार वृषाली पाटील यांनी केली पाहणी