शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

देवाचा डोंगर तहानला

By admin | Updated: February 18, 2016 21:15 IST

दापोली तालुका : आतापासूनच तीन किमीची पायपीट

दापोली : तालुक्यातील देवाचा डोंगर येथील उपलब्ध पाण्याचा स्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. सद्यस्थितीत दक्षिण टोकावरील उपलब्ध पाण्यावर तहान भागवताना ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. फेबुवारी महिन्यात ही परिस्थिती असेल, तर एप्रिल व मे महिन्यात ग्रामस्थांचे काय हाल होतील, या विचाराने सर्वांची झोप उडाली आहे.दापोलीतील देवाचा डोंगर हा अतिदुर्गम भाग पालगड जिल्हा परिषद गटात येतो. देवाच्या डोंगरावरील सर्व धनगरवाड्यांमध्ये जानेवारी महिना उजाडण्यापूर्वीच पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरानजीक असलेल्या डुऱ्यातील पाणी पिऊन ग्रामस्थ तहान भागवावी लागत आहे. मात्र, या डुऱ्यातील पाणी आटत चालल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईची चाहुल लागली आहे. जवळपास पाण्याचे कुठलेच जलस्रोत उपलब्ध नसल्याने ३ किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांची आतापासूनच दाहीदिशा सुरू झाली आहे. देवाच्या डोंगरावर एकूण १५० कुटुंब वास्तव्यास आहेत. लोकसंख्या ८०० आहे. ऐन उन्हाळ्यात कोणत्याही कार्यक्रमप्रसंगी पाचशे लीटरचे बरल पाणी आणण्यासाठी ५०० रूपये मोजावे लागतात. येथील लोकांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांना जगण्याकरिता तारेवरील कसरत करावी लागत आहे. शासनाकडून नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात यावी, करून येथील लोकांचे विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होईल, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पावसाळ्यात तुडूंब भरणाऱ्या नद्या. नाले, विहिरी मार्च महिना सुरू झाली की कोरड्या व्हायला लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन देवाचा डोंगर येथील धनगर वाड्यावरती नवीन सार्वजनिक विहिरी बांधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पाण्यासाठी दाहीदिशा : हंडाभर पाण्यासाठी तारेवरची कसरतसध्या तीन किमीची पायपीट केल्यानंतर एखाद्या खोल विहिरीच्या तळाला असलेले पाणी छोट्याशा भांड्याने काढून ते मोठ्या हंड्यात भरावे लागत आहे. पंधरा ते वीस मिनिटांनंतर एखादे भांडे भरून पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी दीर्घ पायपीट करावी लागत आहे.रत्नागिरी व रायगड हे दोन जिल्हे आणि चार तालुके यामध्ये सामावलेल्या या देवाच्या डोंगराचा गंभीर प्रश्न हा लवकरात लवकर कसा सोडविता येईल, याकडे शासनाने जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.