शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी जिल्ह्याच्या परिपूर्ण विकास आराखड्यासाठी सामंजस्य करार

By शोभना कांबळे | Updated: October 2, 2023 16:42 IST

रत्नागिरी : जिल्ह्याचा विकास आराखडा परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ...

रत्नागिरी : जिल्ह्याचा विकास आराखडा परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संस्थेची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मान्यतेने व शासन निर्देशानुसार मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कर्णे व जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्यामध्ये सामंजस्य कराराबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.आराखडा तयार करण्याकामी जिल्ह्यातील विविध विभागांकडून सामर्थ्य, कमकुवतपणा, संधी, धोके, कृती योजना, दृष्टी, ध्येय याबाबत माहिती संकलनाची युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. सन २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत मुख्य सचिवांच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. हा विकास आराखडा तयार करताना विविध शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी आवश्यक त्या कार्यप्रणालीचा या आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे.जिल्हा विकास आराखडा तयार करताना विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करावयाची आहे. तसेच आजचे सकल जिल्हा उत्पन्न व त्यामध्ये पुढील पाच, दहा, पंधरा वर्षांच्या कालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावरही लक्ष्य केंद्रित करावयाचे आहे. कृती कार्यक्रमाचे वर्गीकरण कमी/मध्यम/दीर्घ मुदतीच्या बाबी याप्रमाणे करण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अथवा जिल्ह्यास गुंतवणुकीचे केंद्र म्हणून ओळख देऊ शकणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील क्षेत्रांची बलस्थाने ओळखून विविध योजना कार्यक्रम/ अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी