शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या बालपणात बालगृहांमध्ये मायेचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:58 IST

शोभना कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन ...

शोभना कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुलांची ‘भाग्यविधाते’ ठरू लागल्या आहेत.१४ नोव्हेंबर, मुलांचे लाडके चाचा, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना निखळ आनंद मिळावा, यासाठी या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे बालदिन साजरा होतो. या दिवशी कुठल्या तरी बालगृहात जाऊन तेथील बालकांना खाऊ, कपडे, जेवण यांचे वाटप होते. काहीजण तर आपला वाढदिवसही या मुलांसमवेत साजरा करायला बालगृहात जातात. पण वर्षभर या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची कल्पना फारच थोड्यांना असेल.आज ज्या संस्था पदरमोड करून बालगृह चालवत आहेत, त्यांना शासनाच्या जाचक धोरणामुळे संस्था चालवताना नाकीनऊ येऊ लागले आहे.. शासनाने कितीही घोषणा केल्या तरी राज्याच्या बाल विकास विभागाकडे खुद्द शासनाचेच दुर्लक्ष झाले आहे. आज महागाई गगनाला भिडू पाहात असताना शासनाकडून प्रतिपोषणाचा खर्च प्रतिमूल १५०० रूपये केवळ जाहीर करण्यात आले असला तरी प्रत्यक्षात अजूनही नऊशे रूपये इतकाच खर्च शासनाकडून दिला जात आहे. शासनाची इतर धोरणेही जाचक असल्याने या संस्था त्रस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात रत्नागिरीतील डॉ. न. दा. पानवलकर बालगृह, माहेर, ओणी (ता. राजापूर) येथील वात्सल्य मंदिर, देवरूख येथील गोकुळ, लांजातील बालगृह या संस्था शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता निराधार मुलांचे भविष्य घडविण्याचे कार्य दात्यांच्या सहकार्याने, प्रसंगी पदरमोड करून करीत आहेत. या संस्थांच्या मायेची ऊब या मुलांना मिळत असल्याने त्यांना विविध सणांचा आनंद मिळतो आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेतच नव्हे; तर विविध क्षेत्रातही यश मिळवू लागली आहेत. संस्थांच्या छताखाली राहून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करून स्वावलंबी बनली आहेत.शासनाच्या बालविकासाच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात बालविकास झाकोळलेलाच आहे. बाल हक्कांची पायमल्ली होत आहे. मात्र, शासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे.