शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान

By admin | Updated: June 30, 2017 15:40 IST

प्राथमिक अहवाल : झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. ३0 : जिल्ह्यात बुधवार (दि. २७) रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी घरे व गोठे यांचे सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि घरगुती वस्तुंचे एकूण २ लाख ६८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळी आंबा घाटासह अन्य ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. मात्र, आता वाहतूक पूर्र्ववत सुरू झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार बरसण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील साडेय येथील नरेश जाधव यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे ४४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

आनंदी महादेव, परेश गुजराथी, संतोष धनावडे यांच्या घराचे अंशत: मिळून १६, ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील निर्मला जाधव यांचे पावसात घर पडल्याने नुकसान झाले. शिरगाव येथील सतीश चव्हाण यांच्या घरावर झाड पडून ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील घरांमध्ये पाणी भरल्याने इलेक्ट्रॉनिक्स तसेच घरगुती वस्तुंचे नुकसान झाले आहे. यात तुळशीदास टाक, भगवान जाधव, संजय कदम, वासंती भोसले, दिनानाथ कतार यांचा समावेश आहे. राजेंद्र भोजने यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यात कोंबड्या वाहून गेल्या असून, घराचेही २६,५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शिवराम पावसकर, गजानन नाटेकर यांच्या घरावरील कौले उडाली आहेत.

आंबा घाटात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई - गोवा महामार्गावर आज सायंकाळी ५ वाजता झाड कोसळले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. गेल्या २४ तासात पावसामुळे जिल्ह्यात ३ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.