शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान

By admin | Updated: June 30, 2017 15:40 IST

प्राथमिक अहवाल : झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. ३0 : जिल्ह्यात बुधवार (दि. २७) रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी घरे व गोठे यांचे सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि घरगुती वस्तुंचे एकूण २ लाख ६८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळी आंबा घाटासह अन्य ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. मात्र, आता वाहतूक पूर्र्ववत सुरू झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार बरसण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील साडेय येथील नरेश जाधव यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे ४४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

आनंदी महादेव, परेश गुजराथी, संतोष धनावडे यांच्या घराचे अंशत: मिळून १६, ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील निर्मला जाधव यांचे पावसात घर पडल्याने नुकसान झाले. शिरगाव येथील सतीश चव्हाण यांच्या घरावर झाड पडून ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील घरांमध्ये पाणी भरल्याने इलेक्ट्रॉनिक्स तसेच घरगुती वस्तुंचे नुकसान झाले आहे. यात तुळशीदास टाक, भगवान जाधव, संजय कदम, वासंती भोसले, दिनानाथ कतार यांचा समावेश आहे. राजेंद्र भोजने यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यात कोंबड्या वाहून गेल्या असून, घराचेही २६,५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शिवराम पावसकर, गजानन नाटेकर यांच्या घरावरील कौले उडाली आहेत.

आंबा घाटात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई - गोवा महामार्गावर आज सायंकाळी ५ वाजता झाड कोसळले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. गेल्या २४ तासात पावसामुळे जिल्ह्यात ३ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.