शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान

By admin | Updated: June 30, 2017 15:40 IST

प्राथमिक अहवाल : झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. ३0 : जिल्ह्यात बुधवार (दि. २७) रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी घरे व गोठे यांचे सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि घरगुती वस्तुंचे एकूण २ लाख ६८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळी आंबा घाटासह अन्य ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. मात्र, आता वाहतूक पूर्र्ववत सुरू झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार बरसण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील साडेय येथील नरेश जाधव यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे ४४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

आनंदी महादेव, परेश गुजराथी, संतोष धनावडे यांच्या घराचे अंशत: मिळून १६, ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील निर्मला जाधव यांचे पावसात घर पडल्याने नुकसान झाले. शिरगाव येथील सतीश चव्हाण यांच्या घरावर झाड पडून ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील घरांमध्ये पाणी भरल्याने इलेक्ट्रॉनिक्स तसेच घरगुती वस्तुंचे नुकसान झाले आहे. यात तुळशीदास टाक, भगवान जाधव, संजय कदम, वासंती भोसले, दिनानाथ कतार यांचा समावेश आहे. राजेंद्र भोजने यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यात कोंबड्या वाहून गेल्या असून, घराचेही २६,५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शिवराम पावसकर, गजानन नाटेकर यांच्या घरावरील कौले उडाली आहेत.

आंबा घाटात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई - गोवा महामार्गावर आज सायंकाळी ५ वाजता झाड कोसळले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. गेल्या २४ तासात पावसामुळे जिल्ह्यात ३ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.