शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

निःशब्द... काही व्यापारी रडले, काहींनी शटरच नाही उघडले; महापुरात तब्बल ५०० कोटींचं नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 13:42 IST

चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला ...

चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शहरातील सुमारे ३ हजार, तर खेर्डीतील १२०० व्यापाऱ्यांना फटका बसला असून, सुमारे ५०० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येथील बाजारपेठेत बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पाणी शिरू लागले होते. मात्र, तरीही सर्वच व्यापारी बेसावध राहिले. जेव्हा दुकानात पाणी शिरले तेव्हा दुकानातील माल सुरक्षितस्थळी हटवण्यासाठी हाताशी कामगार व अन्य कोणी नव्हते. अशा वेळी नेहमीची पूररेषा लक्षात घेत त्या उंचीवर काहींनी माल रचून ठेवला, तर काहींनी एवढं पाणी वाढणार नाही, असा समज करत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, २६ जुलै २००५मधील महापुराची पातळी महापुराने ओलांडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी मालाच्या सुरक्षिततेची आशाच सोडून दिली. त्याचे खरे रौद्ररुप शनिवारी सकाळी प्रत्यक्षात पहिल्यानंतर व्यापारी अक्षरशः खचून गेले. अशावेळी दुकान उघण्याचेही अनेकांना धाडस झाले नाही. काहींनी दुकान उघडले, परंतु परिस्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अनेकांच्या दुकानात किमान एका फूट इतका गाळ साचला असून, तितकाच गाळ मालावर आहे. अगदी कापड, किराणा, बेकरी, हॉटेल, घरगुती वस्तू, फर्निचर, ज्वेलर्स, हेअर कटिंग, धूप - अगरबत्ती, पूजेचे साहित्य, प्लास्टिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात व मॉलमध्येही अतोनात नुकसान झाले आहे. त्याशिवाय प्रिंटिंग मशीन, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश दुकानांसमोर निकामी झालेल्या वस्तू व साहित्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय काही दुकानांचे शटर उखडले असून, बांधकामाचीही हानी झाली आहे.

चिपळूण शहराच्या इतिहासात प्रथमच व्यापाऱ्यांची इतकी मोठी हानी झाली आहे. शासकीय यंत्रणेने सतर्कता न बाळगल्याने बाजारपेठेतील व्यापारी या पूरपरिस्थितीबाबत अनभिज्ञ राहिला. इतके नुकसान याआधी कधीही झाले नाही व या महापुरातही झाले नसते. त्यामुळे या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देताना तितकी गांभीर्यता लक्षात घ्यायला हवी. आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाला आहे. त्यात आता महापुरामुळे चिपळूणचा व्यापार संपुष्टात आला आहे.

- शिरीष काटकर, अध्यक्ष, चिपळूण व्यापारी संघ.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाChiplunचिपळुणRainपाऊस