शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

निःशब्द... काही व्यापारी रडले, काहींनी शटरच नाही उघडले; महापुरात तब्बल ५०० कोटींचं नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 13:42 IST

चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला ...

चिपळूण : आस्मानी संकट बनून आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये दोन दिवस अक्षरशः थैमान घातले. त्यात संपूर्ण बाजारपेठ व लगतचा गजबजलेला परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शहरातील सुमारे ३ हजार, तर खेर्डीतील १२०० व्यापाऱ्यांना फटका बसला असून, सुमारे ५०० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येथील बाजारपेठेत बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पाणी शिरू लागले होते. मात्र, तरीही सर्वच व्यापारी बेसावध राहिले. जेव्हा दुकानात पाणी शिरले तेव्हा दुकानातील माल सुरक्षितस्थळी हटवण्यासाठी हाताशी कामगार व अन्य कोणी नव्हते. अशा वेळी नेहमीची पूररेषा लक्षात घेत त्या उंचीवर काहींनी माल रचून ठेवला, तर काहींनी एवढं पाणी वाढणार नाही, असा समज करत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, २६ जुलै २००५मधील महापुराची पातळी महापुराने ओलांडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी मालाच्या सुरक्षिततेची आशाच सोडून दिली. त्याचे खरे रौद्ररुप शनिवारी सकाळी प्रत्यक्षात पहिल्यानंतर व्यापारी अक्षरशः खचून गेले. अशावेळी दुकान उघण्याचेही अनेकांना धाडस झाले नाही. काहींनी दुकान उघडले, परंतु परिस्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अनेकांच्या दुकानात किमान एका फूट इतका गाळ साचला असून, तितकाच गाळ मालावर आहे. अगदी कापड, किराणा, बेकरी, हॉटेल, घरगुती वस्तू, फर्निचर, ज्वेलर्स, हेअर कटिंग, धूप - अगरबत्ती, पूजेचे साहित्य, प्लास्टिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात व मॉलमध्येही अतोनात नुकसान झाले आहे. त्याशिवाय प्रिंटिंग मशीन, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश दुकानांसमोर निकामी झालेल्या वस्तू व साहित्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय काही दुकानांचे शटर उखडले असून, बांधकामाचीही हानी झाली आहे.

चिपळूण शहराच्या इतिहासात प्रथमच व्यापाऱ्यांची इतकी मोठी हानी झाली आहे. शासकीय यंत्रणेने सतर्कता न बाळगल्याने बाजारपेठेतील व्यापारी या पूरपरिस्थितीबाबत अनभिज्ञ राहिला. इतके नुकसान याआधी कधीही झाले नाही व या महापुरातही झाले नसते. त्यामुळे या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देताना तितकी गांभीर्यता लक्षात घ्यायला हवी. आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाला आहे. त्यात आता महापुरामुळे चिपळूणचा व्यापार संपुष्टात आला आहे.

- शिरीष काटकर, अध्यक्ष, चिपळूण व्यापारी संघ.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाChiplunचिपळुणRainपाऊस