शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा कोकणला यंदा दोनशे जादा गाड्या

By admin | Updated: August 24, 2014 00:41 IST

रत्नागिरी विभागामध्ये येणार १४०० गाड्या

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने मुंबईकर बहुसंख्येने गावाकडे येतात. यावर्षी गणेशोत्सवाकरिता कोकणात १९०० जादा गाड्या येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० जादा गाड्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा भाविकांची संख्या जास्त असेल, या अंदाजाने गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. २४ आॅगस्टपासून या गाड्या येणार असून त्यासाठी महामंडळाने महामार्गावरती गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे.दि. २४, २५, २६ व २७आॅगस्टपर्यंत जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. दररोजच्या १५० गाड्या वगळता १४०० गाड्यांचे नियोजन रत्नागिरी विभागासाठी करण्यात आले आहे तर ५०० गाड्या रायगड व सिंधुदुर्ग येथे येणार आहेत. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनाने रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. २४ आॅगस्टपासून कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.दि. २६ आॅगस्ट रोजी रत्नागिरीमध्ये ४०५ जादा गाड्या येणार असून २१४ ग्रुपबुकींगच्या आहेत तर १९१ आरक्षण केलेल्या आहेत. दि. २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक जादा गाड्या येणार आहेत. ११४२ जादा गाड्या असून ८७८ ग्रुप बुकींगच्या गाड्या आहेत तर २६४ आरक्षणाच्या गाड्या आहेत. दि. २८ आॅगस्ट रोजी २५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून १२५ ग्रुप बुकींग तर १३५ आरक्षणाच्या गाड्या येणार आहेत.महामार्गावरती चालकांना मार्ग दाखविण्यासाठी कर्मचारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील तीन ठिकाणी हे कर्मचारी पथक चालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. गणेशोत्सवासाठी पुणे, कोल्हापूर येथून जादा गाड्या चालकांसहित मागविण्यात येत असल्यामुळे त्यांना कोकणातील मार्गांची दिशादर्शक करण्यात येते. महामंडळातर्फे मुंबईकरांना सुरक्षित गावापर्यंत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले असून फिरत्या पथकाद्वारे योग्य खबरदारी घेण्यात येणार असल्याचे विभागनियंत्रक के. व्ही. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)