शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा कोकणला यंदा दोनशे जादा गाड्या

By admin | Updated: August 24, 2014 00:41 IST

रत्नागिरी विभागामध्ये येणार १४०० गाड्या

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने मुंबईकर बहुसंख्येने गावाकडे येतात. यावर्षी गणेशोत्सवाकरिता कोकणात १९०० जादा गाड्या येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० जादा गाड्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा भाविकांची संख्या जास्त असेल, या अंदाजाने गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. २४ आॅगस्टपासून या गाड्या येणार असून त्यासाठी महामंडळाने महामार्गावरती गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे.दि. २४, २५, २६ व २७आॅगस्टपर्यंत जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. दररोजच्या १५० गाड्या वगळता १४०० गाड्यांचे नियोजन रत्नागिरी विभागासाठी करण्यात आले आहे तर ५०० गाड्या रायगड व सिंधुदुर्ग येथे येणार आहेत. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनाने रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. २४ आॅगस्टपासून कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.दि. २६ आॅगस्ट रोजी रत्नागिरीमध्ये ४०५ जादा गाड्या येणार असून २१४ ग्रुपबुकींगच्या आहेत तर १९१ आरक्षण केलेल्या आहेत. दि. २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक जादा गाड्या येणार आहेत. ११४२ जादा गाड्या असून ८७८ ग्रुप बुकींगच्या गाड्या आहेत तर २६४ आरक्षणाच्या गाड्या आहेत. दि. २८ आॅगस्ट रोजी २५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून १२५ ग्रुप बुकींग तर १३५ आरक्षणाच्या गाड्या येणार आहेत.महामार्गावरती चालकांना मार्ग दाखविण्यासाठी कर्मचारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील तीन ठिकाणी हे कर्मचारी पथक चालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. गणेशोत्सवासाठी पुणे, कोल्हापूर येथून जादा गाड्या चालकांसहित मागविण्यात येत असल्यामुळे त्यांना कोकणातील मार्गांची दिशादर्शक करण्यात येते. महामंडळातर्फे मुंबईकरांना सुरक्षित गावापर्यंत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले असून फिरत्या पथकाद्वारे योग्य खबरदारी घेण्यात येणार असल्याचे विभागनियंत्रक के. व्ही. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)