शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीच्या समर्थनार्थ विधानभवनावर धडकणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन ...

राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन दिलेले असतानाच आता मुंबईस्थित तालुकावासीय आणि मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांना आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावरच प्रचंड मोर्चा काढण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीयांना केले आहे.

काही महिन्यांपूर्वी तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी जे राजकीय पक्ष एनजीओंच्या प्रभावामुळे विरोध करत होते, त्यापैकी शिवसेना वगळून इतर सर्वच राजकीय पक्ष आता रिफायनरीचे समर्थन करत आहेत. तर नाणार परिसरातील अनेक गावांमधून आता या रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत आहे. या भागातील सुमारे दीड हजार कुटुंबांनी आपल्या जमिनी स्वखुशीने या प्रकल्पाला देण्यासाठीची संमतीपत्र दिलेली आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार एकर जमिनीची नाणार परिसरात गरज असून, त्यापैकी सुमारे साडेआठ हजार एकरची संमतीपत्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने आता हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प करण्यास आता फक्त शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे तालुक्यामधून आता हा प्रकल्प बारसू सोलगाव परिसरात उभारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी सर्वांनीच समर्थन दिलेले आहे. तरीही राज्य सरकार या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने व त्यातच या प्रकल्पाची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन विदर्भात केलेली आहे. कोकणात या प्रकल्पाची नितांत गरज असून, हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी केले आहे.