शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील वानर, माकडांचेही होणार निर्बिजीकरण

By संदीप बांद्रे | Updated: April 25, 2023 18:28 IST

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला आपला अहवाल सादर केला

चिपळूण : कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये जास्तीत जास्त नुकसानभरपाई, नुकसान टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर वानर, माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस या अहवालात केली आहे.राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इत्यादी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. फळझाडांच्या नुकसानाचे मूल्य निश्चित करण्याकरिता कार्यपद्धती ठरविणे आवश्यक असल्याचे सांगत समितीची स्थापना करण्यात आली.वन विभागाचे कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर. एस, रामनुजम यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शेखर निकम, याेगेश कदम, भास्कर जाधव, नितेश राणे, कृषी आयुक्त, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ उद्यानविद्या शाखा प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. योगेश परूळकर, डॉ. विनायक पाटील, कृषी आयुक्त व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे प्रतिनिधी, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. सिंधुदुर्गमधील मोरे, वडोस, मनगाव, जमसंडे, रत्नागिरी जिल्ह्यातील बांधतिवरे, पालशेत व सावर्डे या भागातील बाधित क्षेत्रातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले.याबाबत मंत्रालयात सोमवारी (२४ एप्रिल) या समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये नुकसान भरपाई, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह करण्यात येणाऱ्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. हिमाचल प्रदेश या राज्यात माकड या प्राण्याची संख्या वाढल्याने त्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा उपक्रम २००७ पासून सुरू आहे. त्या राज्यात आजवर सुमारे १ लाख ८० हजार माकडांचे (नर व मादी) निर्बिजीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे माकडांची संख्या कमी व नियंत्रणात राहिली आहे. माकड व वानरे पकडून जंगलात सोडण्याची शिफारस मान्य झाल्यास शासनाने अशा प्रकारचा प्रयोग करून पाहण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील अनुभव समजून घेण्यासाठी अभ्यासगटाचा दौरा आयोजित करण्याची शिफारस करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी