शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

कोकणातील वानर, माकडांचेही होणार निर्बिजीकरण

By संदीप बांद्रे | Updated: April 25, 2023 18:28 IST

कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला आपला अहवाल सादर केला

चिपळूण : कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये जास्तीत जास्त नुकसानभरपाई, नुकसान टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर वानर, माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस या अहवालात केली आहे.राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इत्यादी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहर, फुलोरा, पालवी इत्यादीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. फळझाडांच्या नुकसानाचे मूल्य निश्चित करण्याकरिता कार्यपद्धती ठरविणे आवश्यक असल्याचे सांगत समितीची स्थापना करण्यात आली.वन विभागाचे कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर. एस, रामनुजम यांच्या अध्यक्षतेखाली आमदार शेखर निकम, याेगेश कदम, भास्कर जाधव, नितेश राणे, कृषी आयुक्त, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ उद्यानविद्या शाखा प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. योगेश परूळकर, डॉ. विनायक पाटील, कृषी आयुक्त व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे प्रतिनिधी, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. सिंधुदुर्गमधील मोरे, वडोस, मनगाव, जमसंडे, रत्नागिरी जिल्ह्यातील बांधतिवरे, पालशेत व सावर्डे या भागातील बाधित क्षेत्रातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले.याबाबत मंत्रालयात सोमवारी (२४ एप्रिल) या समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये नुकसान भरपाई, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह करण्यात येणाऱ्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. हिमाचल प्रदेश या राज्यात माकड या प्राण्याची संख्या वाढल्याने त्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा उपक्रम २००७ पासून सुरू आहे. त्या राज्यात आजवर सुमारे १ लाख ८० हजार माकडांचे (नर व मादी) निर्बिजीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे माकडांची संख्या कमी व नियंत्रणात राहिली आहे. माकड व वानरे पकडून जंगलात सोडण्याची शिफारस मान्य झाल्यास शासनाने अशा प्रकारचा प्रयोग करून पाहण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील अनुभव समजून घेण्यासाठी अभ्यासगटाचा दौरा आयोजित करण्याची शिफारस करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी