शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

निमंत्रणाविना आदर्श पुरस्कार सोहळा

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त

रत्नागिरी : केवळ एका दिवसांत निर्णय घेऊन तीन वर्षांचे आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रणच न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे तीन वर्षे या पुरस्कारांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वंचित होते. हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जात असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या पुरस्काराचे वितरण गेली दोन वर्षे रखडले होते. सन २०१२-१३, २०१३-१४ आणि सन २०१४-१५ या तिन्ही वर्षांचे एकूण २७ आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार बुधवारी वितरण करण्यात आले. या समारंभाला अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व वित्त सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी व अन्य उपस्थित होते. सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला असला तरी याला नाराजीची मोठी किनार होती. जिल्हा परिषदेचा कार्यक्रम म्हटला की, सर्व पदाधिकारी, सदस्यांना हक्काने निमंत्रित करणे आवश्यक होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार १५ दिवसांच्या रजेवर गेल्यावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे हजर झाल्यावर पुरस्कारासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर ताबडतोब बुधवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अर्ध्या तास आधी काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, बहुतांश सदस्यांना या पुरस्काराचे निमंत्रणही मिळालेले नाही. तीन वर्षांनंतर देण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे आवश्यक होते. मात्र, ग्रामपंचायत विभागाने घाईने हा कार्यक्रम उरकून घेतला. एवढी घाई कशासाठी, कोणासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत विभागाच्या अशा कारभाराबद्दल सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी २० हजार रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, हा कार्यक्रम घाईत असल्याने या कार्यक्रमाचा खर्च ग्रामसेवक संघटनेवर लादण्यात आला होता. त्यामुळे एवढ्या घाईत कार्यक्रम उरकून ग्रामपंचायत विभागाने काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत विभागाने घाई का केली. ग्रामपंचायत विभागाने हा कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून घाईत उरकून घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.