शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेविरोधात कोकण भवनावर मोचा

By admin | Updated: September 9, 2014 23:47 IST

ढिसाळ कारभार : प्रवासीवर्गातून व्यक्त केला जातोय संतार्प

पाचल : कोकण रेल्वेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. बहुतांश प्रवाशांना अनंत अडचणीना तोंड देऊन मानसिक त्रास सहन करावा लागला. परिणामी कोकण रेल्वेच्या या गलथान कारभाराबद्दल तमाम कोकणवासीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या कोकण रेल्वेचे चेअरमन व सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतुकीचे डब्बे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली. त्यामुळे लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या ८ ते १० तास उशिरा धावत होत्या. एकंदरीत गर्दीच्या हंगामातच रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडली होती. प्रवाशांनी सहा सहा महिने अगोदर तिकीट आरक्षण करुन देखील कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाीस वाहतुकीचे नियोजन करता आले नाही. या अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका कोकणातील लाखो प्रवाशांना बसला. त्यामुळे या अकार्यक्षम अधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन त्यांच्या गलथान कारभाराची चौकशी करण्याची मागणी केळुसकर यांनी केली आहे.कोकण रेल्वेची क्षमता प्रवासी वाहतूक करण्याएवढीच मर्यादित असताना या मार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरु आहे. त्यामुळे हा मार्ग खचण्याचा पुन्हा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कोकण रेल्वे मार्गाचे तातडीने दुपदरीकरणाचे काम सुरु करण्याची मागणी केळुसकर यांनी केली आहे. कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वेने एक पत्रक काढून कोकण रेल्वेच्या काही जादा गाड्या व अन्य गाड्या प्रवाशांअभावी बंद करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आखला आहे. अधिकाऱ्यांचे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी कोकणातील काही सामाजिक संघटनांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी कोकण रेल्वे भवन येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कोकण विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी उतरणार आहेत. तमाम कोकणवासीयांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केळुसकर यांनी केले आहे. (वार्ताहर)कोकण रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संताप व्यक्त करीत असून गणेशोत्सवात रेल्वेच्या मर्यादा उघड झाल्यामुळे हा प्रकार काय आहे असा सवाल करून . अधिकाऱ्यांची चौकशी करावी या प्रकरणी मध्य रेल्वेलाही जबाबदार धरावे असे केळूसकर म्हणाले.