शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

खेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:47 IST

वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.

ठळक मुद्देखेडमध्ये पावसासाठी मनसेचे महादेवाला साकडेखांबतळेतील मंदिराचा गाभारा पाण्याने भरला

खेड : वरुणराजाच्या आगमनाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील खांबतळे येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शंभुमहादेवाला यावेळी साकडे घालण्यात आले.रोहिणी आणि मृग कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आर्द्रा नक्षत्रात लावणीकामासाठी लागणारा कोकणातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यास वरुणराजा प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल, अशी हिंदू धर्मात धारणा आहे. पावसाचे आगमन लांबल्यास देशभरात विविध मंदिरांचे गाभारे पाण्याने भरण्याची पद्धत आहे.

शंकर मंदिरात परिसरातील महिला, पुरुषांनी महादेवाच्या पिंडीचा गाभारा पाण्याने भरुन पाऊस पडण्यासाठी वरूणराजाला साकडे घातले. शहरातील खांबतळे येथील शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरून पावसासाठी देवालाच साकडे घालण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तालुका अध्यक्षा राजश्री पाटणे, शहर अध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, मनाली पावसकर, भरणे ग्रामपंचायत सरपंच ललिता चिले, नंदू साळवी, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश धारीया, खेड तालुका अध्यक्ष पुष्पेन दिवटे, शहर अध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपशहर अध्यक्ष सिध्देश साळवी, दादु नांदगावकर, गणेश सुर्वे, कौशल चिखले, अविनाश माने, संतोष पवार व खेड शहरातील नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी