शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मनसे कोकणातील सर्व जागा लढणार : उपरकर

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

माजी आमदार परशुराम उपरकर पत्रकार परिषदेत बोलत होते

कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्यात येणार आहेत. काँग्रेस आघाडी शासनाने कोकणची केलेली फसवणूक तसेच विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढविण्यात येईल, अशी माहिती मनसेचे कोकण विभाग संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, शनिवारी मुंबई येथे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक झाली. यावेळी आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील विधानसभेच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातून मनसे आपले उमेदवार देणार आहे. पक्ष निरीक्षकांकडे इच्छुकांची नावे देण्यात आली आहेत. उमेदवार निश्चितीसाठी स्वत: राज ठाकरे संबंधितांची मुलाखत घेतील, असेही त्यांनी सांगितले.उपरकर पुढे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने जाहीर केलेले कोकण पॅकेज हे फसवे होते. पालकमंत्री तसेच सावंतवाडीच्या आमदारांनी या पॅकेजबाबत मोठा गवगवा केला होता. मात्र, जनतेची फसवणूकच झाली आहे. जिल्ह्यातील प्रथम कॅबिनेट मंत्री होण्याचा मान मिळालेले भाई सावंत यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पालकमंत्री नारायण राणे तसेच आमदार दीपक केसरकर हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. तीव्र इच्छाशक्ती नसल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांकडे या स्मारकासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)