शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

मिऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा फटका

By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST

जोरदार लाटा : दगड सरकू लागल्याने धोका

रत्नागिरी : पौर्णिमेच्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याच्या कामात केलेली अफरातफर जोरदार लाटांनी उघड केली असून बंधाऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. अनेक ठिकाणी दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडल्या आहेत.समुद्राच्या अतिक्रमणापासून मिऱ्यावासियांचे संरक्षण व्हावे, यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा गेली दोन वर्षे उभारला जात होता. मात्र या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार स्थानिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष मिऱ्यावासियांच्या जीवावर बेतणार असल्याचे दृश्य या बंधाऱ्याची पाहणी करता दिसून येत आहे.पावसाळ्यातील भरतीच्यावेळी येथील समुद्राच्या लाटा संरक्षक बंधारा ओलांडून गावात घुसत असतात. या लाटांची गती कमी व्हावी, या हेतूने धूप प्रतिबंधक बंधारा उभारला जाणे गरजेचे असते. मात्र मुरुगवाडा पंधरामाडपासून जाकिमिऱ्या उपळेकर बागेपर्यंत हा संरक्षक बंधारा उभारताना ठेकेदाराने पाच किलोपासून ५ टनापर्यंतचे दगड वापरले आहेत.बंधाऱ्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठे टनावारी दगड रचत असताना पोटात मात्र बारीक ५ ते १५ किलो वजनाचे दगड ओतून ठेवले. वादळी वाऱ्यासोबतच वेगवान लाटांचा तडाखा बसताच आतील दगड हलले. याचा परिणाम मोठ्या दगडांवर होवून ते ढासळू लागले आहे. त्यामुळे हा बंधारा गावाचे राहोच, पण स्वत:चे तरी रक्षण करेल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)