शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

मिऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा फटका

By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST

जोरदार लाटा : दगड सरकू लागल्याने धोका

रत्नागिरी : पौर्णिमेच्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याच्या कामात केलेली अफरातफर जोरदार लाटांनी उघड केली असून बंधाऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. अनेक ठिकाणी दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडल्या आहेत.समुद्राच्या अतिक्रमणापासून मिऱ्यावासियांचे संरक्षण व्हावे, यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा गेली दोन वर्षे उभारला जात होता. मात्र या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार स्थानिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष मिऱ्यावासियांच्या जीवावर बेतणार असल्याचे दृश्य या बंधाऱ्याची पाहणी करता दिसून येत आहे.पावसाळ्यातील भरतीच्यावेळी येथील समुद्राच्या लाटा संरक्षक बंधारा ओलांडून गावात घुसत असतात. या लाटांची गती कमी व्हावी, या हेतूने धूप प्रतिबंधक बंधारा उभारला जाणे गरजेचे असते. मात्र मुरुगवाडा पंधरामाडपासून जाकिमिऱ्या उपळेकर बागेपर्यंत हा संरक्षक बंधारा उभारताना ठेकेदाराने पाच किलोपासून ५ टनापर्यंतचे दगड वापरले आहेत.बंधाऱ्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठे टनावारी दगड रचत असताना पोटात मात्र बारीक ५ ते १५ किलो वजनाचे दगड ओतून ठेवले. वादळी वाऱ्यासोबतच वेगवान लाटांचा तडाखा बसताच आतील दगड हलले. याचा परिणाम मोठ्या दगडांवर होवून ते ढासळू लागले आहे. त्यामुळे हा बंधारा गावाचे राहोच, पण स्वत:चे तरी रक्षण करेल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)