शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

दुरुस्तीत शाळा नापास!

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील ५७६ शाळा मोडकळीस

रहिम दलाल - रत्नागिरी -जिल्हा परिषदेच्या सुमारे ५७६ प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, अपुऱ्या निधीमुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्हा नियोजन मंडळाकडून आलेल्या ६० लाख रुपयांच्या अपुऱ्या निधीतून दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या ३६ शाळांची गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुरुस्ती झालेली नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ८ हजार २०० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये अनेक शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ जिल्ह्यात सुमारे ५७६ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ मात्र, जिल्हा नियोजनकडून मागील आर्थिक वर्षामध्ये केवळ ६० रुपये दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्यातून केवळ ३६ दुरुस्तीसाठी घेण्यात आल्या होत्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेले अनुदान प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या ३६ शाळांचीही दुरुस्ती झालेली नाही. पावसाळा सुरु असल्याने जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांना आता गळती लागली आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेमध्येही जोरदार चर्चा झाली होती. नियोजनकडे शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केलेली असताना केवळ ६० लाख रुपये देऊन पाने पुसण्यात आली. त्यातून केवळ ३६ शाळा दुरुस्त होणार असल्या तरी उर्वरित ५४० शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान कुठून आणणार, असा प्रश्न शिक्षण विभागाला सतावत आहे. तसेच या नादुरुस्त शाळा पडून अनर्थ घडल्यास त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तालुकानादुरुस्त शाळामंडणगड१दापोली२खेड१चिपळूण५गुहागर१संगमेश्वर ९रत्नागिरी१६लांजा१एकूण३६