शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

दुरुस्तीत शाळा नापास!

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील ५७६ शाळा मोडकळीस

रहिम दलाल - रत्नागिरी -जिल्हा परिषदेच्या सुमारे ५७६ प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, अपुऱ्या निधीमुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्हा नियोजन मंडळाकडून आलेल्या ६० लाख रुपयांच्या अपुऱ्या निधीतून दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या ३६ शाळांची गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुरुस्ती झालेली नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ८ हजार २०० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये अनेक शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ जिल्ह्यात सुमारे ५७६ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ मात्र, जिल्हा नियोजनकडून मागील आर्थिक वर्षामध्ये केवळ ६० रुपये दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्यातून केवळ ३६ दुरुस्तीसाठी घेण्यात आल्या होत्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेले अनुदान प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या ३६ शाळांचीही दुरुस्ती झालेली नाही. पावसाळा सुरु असल्याने जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांना आता गळती लागली आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेमध्येही जोरदार चर्चा झाली होती. नियोजनकडे शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केलेली असताना केवळ ६० लाख रुपये देऊन पाने पुसण्यात आली. त्यातून केवळ ३६ शाळा दुरुस्त होणार असल्या तरी उर्वरित ५४० शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान कुठून आणणार, असा प्रश्न शिक्षण विभागाला सतावत आहे. तसेच या नादुरुस्त शाळा पडून अनर्थ घडल्यास त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तालुकानादुरुस्त शाळामंडणगड१दापोली२खेड१चिपळूण५गुहागर१संगमेश्वर ९रत्नागिरी१६लांजा१एकूण३६