शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

अल्पसंख्य विद्यार्थी भत्त्याला मुकले!

By admin | Updated: May 12, 2014 00:18 IST

रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती

रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कायम राहावी, याकरिता त्यांच्या पालकांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात आला आहे. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे १३ हजार पालकांना बसला आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, पारशी आणि शीख समाजाचा समावेश आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. अल्पसंख्याक लोकसमुहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सन २००८-०९ या वर्षापासून ही योजना लागू करण्यात आली होती. किमान ७५ टक्के उपस्थिती असणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह खासगी अनुदानित शाळांना ही योजना लागू होती. प्रतिदिन २ रुपये याप्रमाणे ९६ दिवसांचा उपस्थिती भत्ता विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येत होता. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १३ हजार ५९४ विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळत होता. त्यांची तालुकानिहाय संख्या आकडेवारी : मंडणगड ८८८, दापोली १६३४, खेड १४९५, चिपळूण २२२८, गुहागर ७७४, संगमेश्वर १५९६, रत्नागिरी २८४४, लांजा १०४५ व राजापूर १०९०. या अनुदानापोटी शासनाने गेल्यावर्षी २६ लाख १० हजार ४८ रुपये वाटप केले होते. मागील पाच वर्षांतील अंमलबजावणीचा आढावा घेतला असता या योजनेची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आले. या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचा ठपका ठेऊन शासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १३५00 विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फटका बसला आहे. अल्पसंख्यांक समाजातीलविद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी असा शासनाचा हेतू आहे. त्या हेतूची व योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते याबाबत पालकांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. सध्या जिल्ह्यात या योजनेबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात मात्र तितके यश आलेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (शहर वार्ताहर)