शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

अल्पसंख्य विद्यार्थी भत्त्याला मुकले!

By admin | Updated: May 12, 2014 00:18 IST

रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती

रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कायम राहावी, याकरिता त्यांच्या पालकांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात आला आहे. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे १३ हजार पालकांना बसला आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, पारशी आणि शीख समाजाचा समावेश आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. अल्पसंख्याक लोकसमुहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सन २००८-०९ या वर्षापासून ही योजना लागू करण्यात आली होती. किमान ७५ टक्के उपस्थिती असणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह खासगी अनुदानित शाळांना ही योजना लागू होती. प्रतिदिन २ रुपये याप्रमाणे ९६ दिवसांचा उपस्थिती भत्ता विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येत होता. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १३ हजार ५९४ विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळत होता. त्यांची तालुकानिहाय संख्या आकडेवारी : मंडणगड ८८८, दापोली १६३४, खेड १४९५, चिपळूण २२२८, गुहागर ७७४, संगमेश्वर १५९६, रत्नागिरी २८४४, लांजा १०४५ व राजापूर १०९०. या अनुदानापोटी शासनाने गेल्यावर्षी २६ लाख १० हजार ४८ रुपये वाटप केले होते. मागील पाच वर्षांतील अंमलबजावणीचा आढावा घेतला असता या योजनेची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आले. या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचा ठपका ठेऊन शासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १३५00 विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फटका बसला आहे. अल्पसंख्यांक समाजातीलविद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी असा शासनाचा हेतू आहे. त्या हेतूची व योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते याबाबत पालकांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. सध्या जिल्ह्यात या योजनेबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात मात्र तितके यश आलेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (शहर वार्ताहर)