शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बड्या व्यावसायिकांची लाखोंची बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:48 IST

mahavitaran ratnagiri- गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे.

ठळक मुद्देबड्या व्यावसायिकांची लाखोंची बिले थकीततब्बल ८०० जणांचा पुरवठा खंडित

चिपळूण : गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे. त्यांचे वीज पुरवठा तोडण्यास गेल्यावर थेट ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री व माजी खासदारांकडे धाव घेतली तरीही त्यांना बिल भरण्याची सूचना झाली. पुढील दोन दिवसांत बिल न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यातच राजकीय पुढाऱ्यांकडून वारंवार वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले. वीजबिल कमी होइल, काही प्रमाणात सूट मिळेल, या आशेपाटी अनेकांनी वीजबिले न भरण्याचा निर्णय घेतला. चिपळूण विभागात १२ हजार ७२९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून १० महिन्यांच्या कालावधीत एकही बिल भरलेले नाही. यात बड्या व्यावसायिकांची थकित रक्कमही जास्त आहे.वालोपे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय प्रसिद्ध मोठ्या हॉटेल व्यावसायिकाने सुमारे १२ लाखांचे वीजबिल थकवले आहे. महावितरणकडून या व्यावसायिकाला अनेकदा बिल भरण्याची सूचना देण्यात आली. प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणचे कर्मचारी कारवाईस गेले. तेव्हा हॉटेल मालकाने एका माजी खासदारांना फोन केला.माजी खासदाराने थेट ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला. ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरण अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. याविषयात मंत्र्यांपर्यंत विषय गेला, तरी त्यास फारशी मुभा मिळालेली नाही. त्याने त्वरित २ लाख जमा केले. उर्वरित बिल दोन दिवसांत भरण्याचे आश्वासन दिले. महामार्गावरील आणखी एका हॉटेल व्यावसायिकाचे ६ लाख थकित आहेत. त्याने ५० हजार भरण्याची तयारी दर्शवली.

उर्वरित बिलाची रक्कम न जमा झाल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सावर्डेतील एका उद्योजकाने लाखोंचे बिल थकवले. गेले काही दिवस मात्र कर्मचारी त्याच्याकडे बिलासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यास दाद दिली जात नाही. त्यामुळे दोन दिवसांत या उद्योजकाचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.तब्बल ८०० जणांचा पुरवठा खंडितमहावितरणकडून आतापर्यंत ८०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामध्ये चिपळुणातील ६०० व गुहागरच्या २०० ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.१२ कोटी थकीतचिपळूण विभागात १२,७२९ ग्राहकांचे १२ कोटी ६५ लाख थकीत आहेत. त्यामध्ये २ कोटी गुहागरमधील आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी