शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

बड्या व्यावसायिकांची लाखोंची बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:48 IST

mahavitaran ratnagiri- गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे.

ठळक मुद्देबड्या व्यावसायिकांची लाखोंची बिले थकीततब्बल ८०० जणांचा पुरवठा खंडित

चिपळूण : गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे. त्यांचे वीज पुरवठा तोडण्यास गेल्यावर थेट ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री व माजी खासदारांकडे धाव घेतली तरीही त्यांना बिल भरण्याची सूचना झाली. पुढील दोन दिवसांत बिल न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यातच राजकीय पुढाऱ्यांकडून वारंवार वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले. वीजबिल कमी होइल, काही प्रमाणात सूट मिळेल, या आशेपाटी अनेकांनी वीजबिले न भरण्याचा निर्णय घेतला. चिपळूण विभागात १२ हजार ७२९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून १० महिन्यांच्या कालावधीत एकही बिल भरलेले नाही. यात बड्या व्यावसायिकांची थकित रक्कमही जास्त आहे.वालोपे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय प्रसिद्ध मोठ्या हॉटेल व्यावसायिकाने सुमारे १२ लाखांचे वीजबिल थकवले आहे. महावितरणकडून या व्यावसायिकाला अनेकदा बिल भरण्याची सूचना देण्यात आली. प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणचे कर्मचारी कारवाईस गेले. तेव्हा हॉटेल मालकाने एका माजी खासदारांना फोन केला.माजी खासदाराने थेट ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला. ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरण अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. याविषयात मंत्र्यांपर्यंत विषय गेला, तरी त्यास फारशी मुभा मिळालेली नाही. त्याने त्वरित २ लाख जमा केले. उर्वरित बिल दोन दिवसांत भरण्याचे आश्वासन दिले. महामार्गावरील आणखी एका हॉटेल व्यावसायिकाचे ६ लाख थकित आहेत. त्याने ५० हजार भरण्याची तयारी दर्शवली.

उर्वरित बिलाची रक्कम न जमा झाल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सावर्डेतील एका उद्योजकाने लाखोंचे बिल थकवले. गेले काही दिवस मात्र कर्मचारी त्याच्याकडे बिलासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यास दाद दिली जात नाही. त्यामुळे दोन दिवसांत या उद्योजकाचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.तब्बल ८०० जणांचा पुरवठा खंडितमहावितरणकडून आतापर्यंत ८०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामध्ये चिपळुणातील ६०० व गुहागरच्या २०० ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.१२ कोटी थकीतचिपळूण विभागात १२,७२९ ग्राहकांचे १२ कोटी ६५ लाख थकीत आहेत. त्यामध्ये २ कोटी गुहागरमधील आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी