शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

चिपळूणकरांसाठी '२६ जुलैच्या आठवणींही थरकाप उडवणाऱ्या

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:52 IST

पावसाचे थैमान सुरूच, पुन्हा पुरसदृश्य स्थिती, प्रशासन अलर्ट मोडवर

चिपळूण: मागील आठवड्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा येथे मुसळधार पावसाने थैमान घातले. वाशिष्ठी व शिवनदीने इशारा पातळी गाठल्याने व बाजारपूल परिसरात पाणी शिरल्याने येथील व्यापारी व  नागरिक धास्तावले. परंतू दुपारच्यावेळी ओहोटीला सुरवात झाल्याने काही तासातच पाणी ओसरले. मात्र सायंकाळी ४ वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि चिपळूणकरांच्या अक्षरशः '२६ जुलै २००५'च्या आठवणी ताज्या झाल्या. या संपुर्ण परिस्थितीवर प्रशासन व एनडीआरएफचे पथक सायंकाळी उशीरा पर्यंत लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसापासून चिपळूणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. प्रत्येक विभागात बोटी व अन्य साहित्यांसह पथकही तैनात केले होते. त्यातून शहरात भीती जावून नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली होती.दरम्यान एक दिवस पावसाने विश्रांती घेऊन उघडीप घेतली होती. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच  पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आणि पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. परंतु ओहोटीमुळे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली नव्हती. वाशिष्ठीची इशारा पातळी ५ मीटर असून धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मंगळवारी दुपार पर्यंत ४.६५ मीटर इतकीच पातळी राहिली. त्यावेळी बाजार पुलाजवळील मच्छी मार्केट  व नाईक कंपनी परिसरात काहीसे पाणी शिरले होते. नंतर लगेचच ते ओसरले. अठरा वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने २५ जुलै २००५ ला जोरदार पाऊस सुरु झाला आणि '२६ जुलै'ला महापुराने शहरात हाहाकार घातला. चिपळूणकरांच्या त्याच आठवणी २६ जुलैच्या पूर्वसंध्येला ताज्या झाल्या. मंगळवारी ३५ रोजी पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज करून आपत्ती निवारण पथके यंत्रसामुग्रीसह तैनात केली आहेत. बाजारपुल व अन्य ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. शहरात रिक्षा फिरवून सतर्कतेचे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात होते. सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालया समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्या पाण्यातून मार्ग काढताना वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर लक्षात घेत येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली. 

पावसाची दोन हजारी पार....  गेल्या २४ तासात येथे सकाळी ८ वाजेपर्यंत  १०५ मीली मीटर पाऊस झाला. आतापर्यंत एकूण १९१३.९७ मीली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणात पावसाने दोन हजार मिली मीटरचा टप्पा पार केला. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी कमी कालावधीत यावर्षी अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूर