शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे सदस्यांनी सभा गाजवली

By admin | Updated: March 9, 2017 23:49 IST

जिल्हा परिषद सभा : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

रत्नागिरी : पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आज (गुरुवारी) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सभेत सदस्यांमध्येही वादावादी झाल्याने आजची सभा गाजली. आमदारांवर केलेल्या टीकेमुळे जोरदार वादंग झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व वित्त सभापती विलास चाळके, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर, सदस्य उदय बने, अजित नारकर, रचना महाडिक, अस्मिता केंद्रे, स्वरुपा साळवी, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कारप्राप्त खेड तालुक्यातील पोयनार ग्रामपंचायतीला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष गोलमडे व पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. गेली पाच वर्षे मंडणगड तालुक्यातील बससेवेबाबतचा प्रश्न अजून सुटलेला नसल्याने सदस्या अस्मिता केंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. राजापूरचे गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही जोरदार चर्चा झाली. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांचा धीर चेपल्याने सभेला बिनदिक्कतपणे अनुपस्थित राहात आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी सदस्य अजित नारकर, नंदकुमार मोहिते, बाबू म्हाप, बाळकृष्ण जाधव, अस्मिता केंद्रे यांनी केली. सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असा आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर आणि जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी देऊनही ते सातत्याने गैरहजर राहात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील आमदार अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित का करीत नाहीत, असा प्रश्न नंदकुमार मोहिते यांनी उपस्थित केला. या सभेचा संबंध आमदारांशी जोडू नका, तुम्ही कधी आमदारांना याबाबत लेखी निवेदन दिलेत का, असा प्रश्न म्हाप यांनी मोहितेंना केला. मोहिते यांनी आमदारांवर केलेल्या टीकेबद्दल म्हाप, नारकर, बने हेही त्यांच्यावर आक्रमक झाले. बने यांनी मोहिते यांना आमदारांबद्दलचा शब्द मागे घेण्यास सांगितला. मात्र, मोहिते ठाम राहिले. अधिकारी उपस्थितीत राहात नसतील तर वेगवेगळे पर्याय आहेत, अशा शब्दात नारकर यांनी वर्षभर मिळत नसलेल्या न्यायाबद्दल सुनावले. यावेळी अस्मिता केंद्रेही आक्रमक झाल्या होत्या. (शहर वार्ताहर)