शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

विजेच्या समस्यांबाबत ऊर्जामंत्र्यांकडे बैठक

By admin | Updated: July 9, 2016 00:58 IST

विनायक राऊतांची उपस्थिती : जिल्ह्यातील रिक्त पदांबाबतही चर्चा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्याना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्या निकाली निघाव्यात, यासाठी खासदार विनायक राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांसोबत मंत्रालयात आढावा बैठक घेतली. येथील समस्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील ९५ टक्के रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महावितरणसह सर्वच कामांचा आढावा घेण्यात आला. विजेच्या तारा पडून मृत्युमुखी पडलेल्याना महावितरणकडून तूटपुंजी मदत मिळते. याप्रकरणी ऊर्जा मंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकाला आधार मिळेल अशी मदत द्यावी, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करुनही हा निधी खर्च होत नाही. या निधीबाबत अधिकारी गंभीर नसून, यामुळे होणारी कामे थांबणार असल्याची बाब राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यपालांनी तीन वर्षांपूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ९ हजार कृषिपंपांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक नसल्याने ९ हजारपैकी केवळ ३०० कृषिपंपांचे वितरण केले. तीन वर्षांपासून अधिकारी ९ हजार कृषिपंपाचेच उद्दिष्ट घेऊन आहेत. कृषिपंपाची मागणी करूनही महावितरणकडून कृषिपंपाची जोडणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त असल्याची कैफियत राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांकडे मांडली. जिल्ह्यातील महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरलेले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी कामगारांपैकी काही कामगार प्रशिक्षित नसल्याचे दिसून येत असून, काहींना तर विद्युत खांबावर चढताही येत नाही. विद्युत खांबावर चढण्यासाठी त्यांना स्थानिक ग्राहकांचा आधार घ्यावा लागतो, ही बाब प्रकर्षाने पुढे आली.जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब जीर्ण झाले असून, विजेच्या ताराही धोकादायक अवस्थेत आहेत. आवश्यक असलेल्या ठिकाणी विजेच्या तारा व खांब बदलण्याचा कामांना तत्काळ मंजुरी देऊन ही कामे सुरू करावीत, अशी मागणी राऊत यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे केली असता त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. महावितरणची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून निविदा प्रक्रियेला विरोध करण्यात आला होता. वादग्रस्त निविदा पद्धत बदलून कोटेशन पद्धत लागू करावी, अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे करण्यात आली होती. या विषयावर ऊर्जामंत्र्यांनी तोडगा काढून निविदा पद्धत बंद करून कोटेशन पद्धतीने कामे करुन घ्यावीत, अशी सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिली. (प्रतिनिधी)