शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्यांबाबत ऊर्जामंत्र्यांकडे बैठक

By admin | Updated: July 9, 2016 00:58 IST

विनायक राऊतांची उपस्थिती : जिल्ह्यातील रिक्त पदांबाबतही चर्चा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्याना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्या निकाली निघाव्यात, यासाठी खासदार विनायक राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांसोबत मंत्रालयात आढावा बैठक घेतली. येथील समस्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील ९५ टक्के रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महावितरणसह सर्वच कामांचा आढावा घेण्यात आला. विजेच्या तारा पडून मृत्युमुखी पडलेल्याना महावितरणकडून तूटपुंजी मदत मिळते. याप्रकरणी ऊर्जा मंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकाला आधार मिळेल अशी मदत द्यावी, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करुनही हा निधी खर्च होत नाही. या निधीबाबत अधिकारी गंभीर नसून, यामुळे होणारी कामे थांबणार असल्याची बाब राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यपालांनी तीन वर्षांपूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ९ हजार कृषिपंपांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक नसल्याने ९ हजारपैकी केवळ ३०० कृषिपंपांचे वितरण केले. तीन वर्षांपासून अधिकारी ९ हजार कृषिपंपाचेच उद्दिष्ट घेऊन आहेत. कृषिपंपाची मागणी करूनही महावितरणकडून कृषिपंपाची जोडणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त असल्याची कैफियत राऊत यांनी ऊर्जामंत्र्यांकडे मांडली. जिल्ह्यातील महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरलेले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी कामगारांपैकी काही कामगार प्रशिक्षित नसल्याचे दिसून येत असून, काहींना तर विद्युत खांबावर चढताही येत नाही. विद्युत खांबावर चढण्यासाठी त्यांना स्थानिक ग्राहकांचा आधार घ्यावा लागतो, ही बाब प्रकर्षाने पुढे आली.जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब जीर्ण झाले असून, विजेच्या ताराही धोकादायक अवस्थेत आहेत. आवश्यक असलेल्या ठिकाणी विजेच्या तारा व खांब बदलण्याचा कामांना तत्काळ मंजुरी देऊन ही कामे सुरू करावीत, अशी मागणी राऊत यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे केली असता त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. महावितरणची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून निविदा प्रक्रियेला विरोध करण्यात आला होता. वादग्रस्त निविदा पद्धत बदलून कोटेशन पद्धत लागू करावी, अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे करण्यात आली होती. या विषयावर ऊर्जामंत्र्यांनी तोडगा काढून निविदा पद्धत बंद करून कोटेशन पद्धतीने कामे करुन घ्यावीत, अशी सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिली. (प्रतिनिधी)