शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:16 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.

ठळक मुद्देहापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

रत्नागिरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.कृषी पणन मंडळ, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि. व भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बंगळुरू यांच्या विद्यमाने हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय आयरे, माजी सभापती मधुकर दळवी, रत्नागिरी आंबा उत्पादक संघाचे प्रकाश साळवी, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि.चे व्यवस्थापक विनोद कुमार, विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल आणि कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

सन २०१४मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अर्क साका निवारक हे औषध तयार केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे समाधान झाले असून, फळाची उत्तम गुणवत्ता मिळतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.साका निवारण्याची पध्दतसाका निवारणाच्या दोन पध्दती आहेत. त्यामध्ये एक फवारणीद्वारे, तर दुसऱ्या पध्दतीत फळ द्रावणात बुडविण्यात येते. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटापर्यंत नवे साधन विकसित करण्यात आले आहे. उर्वरित उंचीच्या झाडांसाठी फवारणीद्वारे औषधांचा वापर करता येणार आहे. साकामुळे वाया जाणाऱ्या आंब्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी