शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:16 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.

ठळक मुद्देहापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

रत्नागिरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.कृषी पणन मंडळ, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि. व भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बंगळुरू यांच्या विद्यमाने हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय आयरे, माजी सभापती मधुकर दळवी, रत्नागिरी आंबा उत्पादक संघाचे प्रकाश साळवी, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि.चे व्यवस्थापक विनोद कुमार, विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल आणि कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

सन २०१४मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अर्क साका निवारक हे औषध तयार केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे समाधान झाले असून, फळाची उत्तम गुणवत्ता मिळतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.साका निवारण्याची पध्दतसाका निवारणाच्या दोन पध्दती आहेत. त्यामध्ये एक फवारणीद्वारे, तर दुसऱ्या पध्दतीत फळ द्रावणात बुडविण्यात येते. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटापर्यंत नवे साधन विकसित करण्यात आले आहे. उर्वरित उंचीच्या झाडांसाठी फवारणीद्वारे औषधांचा वापर करता येणार आहे. साकामुळे वाया जाणाऱ्या आंब्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी