शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:16 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.

ठळक मुद्देहापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

रत्नागिरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.कृषी पणन मंडळ, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि. व भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बंगळुरू यांच्या विद्यमाने हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय आयरे, माजी सभापती मधुकर दळवी, रत्नागिरी आंबा उत्पादक संघाचे प्रकाश साळवी, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि.चे व्यवस्थापक विनोद कुमार, विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल आणि कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.

सन २०१४मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अर्क साका निवारक हे औषध तयार केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे समाधान झाले असून, फळाची उत्तम गुणवत्ता मिळतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.साका निवारण्याची पध्दतसाका निवारणाच्या दोन पध्दती आहेत. त्यामध्ये एक फवारणीद्वारे, तर दुसऱ्या पध्दतीत फळ द्रावणात बुडविण्यात येते. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटापर्यंत नवे साधन विकसित करण्यात आले आहे. उर्वरित उंचीच्या झाडांसाठी फवारणीद्वारे औषधांचा वापर करता येणार आहे. साकामुळे वाया जाणाऱ्या आंब्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी