शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

मे महिना येतोय, खबरदारी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने आता गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ...

रत्नागिरी : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने आता गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या मे महिन्यात मुंबईहून येणाऱ्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढू लागली होती. मात्र, अनेक गावांनी गेल्या वर्षी गावी आलेल्या मुंबईकरांचे गावातच विलगीकरण करून कोरोनाला वेशीवरच रोखले होते. त्यामुळे यावर्षी जिल्हावासीयांनी मे महिन्यात कोरोनाविषयक खबरदारी घेतली तर कोरोनाला नक्की रोखता येणार आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबईकरांकडून संसर्ग वाढला. जून महिन्यात तो स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला. त्यानंतर पुन्हा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर गावी आल्याने संसर्ग वाढला. त्यामुळे मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर पोहोचली होती.

यावर्षी मुंबई कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे. त्यामुळे तिथून गावी येणाऱ्यांकडून संसर्ग वाढत आहे. यापुढे ही संख्या वाढणार आहे. मात्र, यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्राम कृती दलाने बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गेल्या वर्षीप्रमाणे विलगीकरणात ठेवायला हवे. प्रत्येक गावामध्ये अशी सोय करून दिल्यास गावांमध्ये होणारा संसर्ग थोपविता येणार आहे.

गेल्या वर्षीच्या मे महिन्याची कोरोना रुग्णसंख्येची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील गावांनी मुंबईवरून येणाऱ्या गावकऱ्यांना विरोध करण्याऐवजी गावातील शाळांमध्ये त्यांच्या अलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून सोय केल्यास गावातील इतर नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका टळणार आहे. त्यामुळे आता गावांमधील ग्राम कृती दलांनी सक्रिय राहण्याची गरज आहे.

मुंबईत दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने मुंबईकरांना अधिक अडचणी येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये मुंबईतून चाकरमानी गावी येण्यास आता हळूहळू सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गावागावांमधून सतर्कता राखून योग्य ती खबरदारी घेतल्यास जिल्हा प्रशासनाला कोरोनाला थोपविण्यात यश येईल.

केवळ एप्रिल महिना पूर्ण होण्याआधीच या एका महिन्यात सुमारे १० हजार रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरातील कोरोना रूग्णांची संख्या केवळ या महिन्यातच झाली आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. त्यामुळे निदान प्रत्येक व्यक्तीने आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनापासून मुक्त राहण्यासाठी योग्य खबरदारी घेतली आणि सामाजिक अंतर राखले तरी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात नक्कीच येईल.

डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी