शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

गुहागरात रंगणार मसापचे साहित्य संमेलन

By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST

वर्धापन दिन : नागनाथ कोत्तापल्ले हे उद्घाटक तर अशोक बागवे अध्यक्षस्थानी

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगती व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिक यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी उर्विमाला साहित्य नगरी पोलीस परेड मैदान गुहागर येथे संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय दिमाखदार साहित्य संमेलनात गुहागरच्या साहित्यिक, ऐतिहासिक व सांस्कृ तिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा मानस संयोजकांनी ठेवला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडी व शोभायात्रेस सुरुवात होईल. शोभायात्रा सकाळी ११ वा. साहित्य नगरीत पोहोचेल. नंतर ११ ते १ वा. प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या संमेलनाचा सुप्रसिद्ध साहित्यिक व ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी अनेक क्षेत्रातील साहित्यिक व मान्यवरांची उपस्थितीत सागरगाज या साहित्य संमेलन स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. दुपारी १ ते ३ वा. मध्यंतर व भोजन, दु. ३ ते ४ वा. पुस्तक प्रकाशन सोहळा, सायंकाळी ४ ते ५ वा. या वेळेत सागरगाज हे स्थानिक कवींचे कवी संमेलन रंगणार आहे. सायंकाळी ५ ते ६ वा. कवी प्रशांत मोरे (मुंबई) यांच्या आईच्या कविता हा राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ७ वा. नंतर कोकणची लोकपरंपरा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम साहित्य नगरीत संपन्न होईल.दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० वा. शालेय विद्यार्थी, पालक शिक्षक यांना केंद्रीय भूत मानून पाठ्यपुस्तकातील कवी लेखक विद्यार्थ्यांचे भेटीला हा कार्यक्रम होईल. सकाळी १०.३० ते ११.३० वा. गुहागरचा सांस्कृतिक व ऐतीहासिक वारसा या विषयावर परिसंवाद रंगणार आहे. सकाळी ११.३० ते १२.३० वा. सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची प्रकट मुलाखत अरुण इंगवले हे घेतील. दुपारी १२.३० ते २ वा. मध्यंतर व भोजन, दुपारी २ ते ३.३० वा. वेळेत कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर ३.३० ते ५ या वेळेत निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन होईल. सायंकाळी ५ नंतर समारोप व पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)