शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात रंगणार मसापचे साहित्य संमेलन

By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST

वर्धापन दिन : नागनाथ कोत्तापल्ले हे उद्घाटक तर अशोक बागवे अध्यक्षस्थानी

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगती व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिक यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी उर्विमाला साहित्य नगरी पोलीस परेड मैदान गुहागर येथे संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय दिमाखदार साहित्य संमेलनात गुहागरच्या साहित्यिक, ऐतिहासिक व सांस्कृ तिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा मानस संयोजकांनी ठेवला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडी व शोभायात्रेस सुरुवात होईल. शोभायात्रा सकाळी ११ वा. साहित्य नगरीत पोहोचेल. नंतर ११ ते १ वा. प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या संमेलनाचा सुप्रसिद्ध साहित्यिक व ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी अनेक क्षेत्रातील साहित्यिक व मान्यवरांची उपस्थितीत सागरगाज या साहित्य संमेलन स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. दुपारी १ ते ३ वा. मध्यंतर व भोजन, दु. ३ ते ४ वा. पुस्तक प्रकाशन सोहळा, सायंकाळी ४ ते ५ वा. या वेळेत सागरगाज हे स्थानिक कवींचे कवी संमेलन रंगणार आहे. सायंकाळी ५ ते ६ वा. कवी प्रशांत मोरे (मुंबई) यांच्या आईच्या कविता हा राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ७ वा. नंतर कोकणची लोकपरंपरा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम साहित्य नगरीत संपन्न होईल.दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० वा. शालेय विद्यार्थी, पालक शिक्षक यांना केंद्रीय भूत मानून पाठ्यपुस्तकातील कवी लेखक विद्यार्थ्यांचे भेटीला हा कार्यक्रम होईल. सकाळी १०.३० ते ११.३० वा. गुहागरचा सांस्कृतिक व ऐतीहासिक वारसा या विषयावर परिसंवाद रंगणार आहे. सकाळी ११.३० ते १२.३० वा. सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची प्रकट मुलाखत अरुण इंगवले हे घेतील. दुपारी १२.३० ते २ वा. मध्यंतर व भोजन, दुपारी २ ते ३.३० वा. वेळेत कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर ३.३० ते ५ या वेळेत निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन होईल. सायंकाळी ५ नंतर समारोप व पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)