शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लाखो रूपयांच्या उलाढालीने बाजारपेठ प्रकाशली

By admin | Updated: October 23, 2014 22:51 IST

निवडणुका आणि दिवाळी या दोन्ही गोष्टी जोडून आल्यामुळे फटाक्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात

रत्नागिरी : गेला बराच काळ मंदीने झाकोळलेली बाजारपेठ दीपावली खरेदीच्या निमित्ताने उजळून निघाली आहे. लक्ष्मीपूजन आणि भाऊबिजेच्या खरेदीसाठी गुरूवारीही बाजारपेठेतील ग्राहक लाट कायम होती. दिवाळी खरेदीत लाखो रूपयांची उलाढाल झाल्यामुळे व्यापारीवर्ग सुखावला आहे. त्यातही सर्वाधिक खरेदी कपड्यांचीच झाली आहे. निवडणुका आणि दिवाळी या दोन्ही गोष्टी जोडून आल्यामुळे फटाक्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.गणपतीच्या दिवसात बाजारपेठेत चांगली गर्दी झाली होती. मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी येत असल्यामुळे त्या दिवसात बाजारपेठेला थोडी तेजी येते. पण, त्यात गणपतीची आरास तयार करण्यासाठीचे, सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात संपते. कपडे किंवा दागिने खरेदी फार मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे बराच काळ बाजारपेठेतील मंदी कायम होती. दिवाळीमध्ये ही कसर बऱ्याच अंशाने भरून निघाली आहे.दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासूनच बाजारपेठेत आलेली ग्राहक लाट दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही (लक्ष्मी पूजनला) कायम होती. दिवाळीचे वातावरण सुरू झाल्यापासूनच बाजारपेठेतील गर्दी वाढू लागली. एका बाजूला आॅनलाईन खरेदीचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे बाजारपेठेतील गर्दीही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही सर्वाधिक गर्दी कपड्यांच्या दुकानात होती. अलिकडे सोन्याचे भाव चांगलेच वाढलेले असल्याने ती खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची होऊ लागली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा वेग कमी झाला आहे. हा वेग वाढावा, यासाठी दीपावलीच्या कालावधीत होऊ शकणारी सोनेखरेदी लक्षात घेऊन हा दर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे साने-चांदीची दुकानेही ग्राहकांनी उजळली. यावर्षी फटाके विक्रीही दणदणीत झाली आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर लगेचच आलेली दिवाळी यामुळे फटाक्यांच्या विक्रीतही आतषबाजी झाली आहे. जागोजागी फटाके विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत आणि सर्व ठिकाणी लोकांची गर्दी आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने फटाक्यांना चांगलीच मागणी आहे. रत्नागिरीतील आविष्कार या मतिमंद मुलांच्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दीपावलीच्या वस्तू विकण्यासाठी मारूती मंदिर येथे स्टॉल लावला होता. छोटे आकाशकंदील, रंगीत पणत्या, मेणबत्त्या यांसारख्या वस्तूंना लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. छोट्या आकाशकंदिलांनाही मोठी मागणी होती. तयार फराळालाही यावर्षी मोठे मार्केट होते. दिवाळीपूर्वी आलेल्या निवडणुकांच्या कामात अडकलेल्या नोकरदारांनी तयार फराळ घेण्यालाच प्राधान्य दिले. त्यामुळे अशा वस्तूंचा खपही यंदा मोठा होता. चकलीच्या तयार भाजणीची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. (प्रतिनिधी)