शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

गर्दीमुळे बाजार उजळला!

By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST

गर्दीचा महापूर : सगळ्याच गावांमध्ये खरेदीला आला वेग

रत्नागिरी/चिपळूण : मतमोजणी होऊन निकाल जाहीर होताच, सर्वसामान्य लोक बाजाराकडे वळले असून, जिकडे-तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. बराच काळ थंड असलेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीमुळे उजळल्या असून, खरेदीला वेग आला आहे. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी तसेच चिपळूण शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेले चार ते पाच दिवस ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. बाजारात रंगीबेरंगी आकाश कंदील, विविध प्रकारच्या शोभिवंत पणत्या, मावळे, रंगीबेरंगी रांगोळ्या व रांगोळ्ीच्या नक्षीचे छाप, सुका मेवा, फळे, तसेच तयार फराळ, फटाक्यांचे स्टॉल रस्त्यावरती लावण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरातील रामआळी, गोखलेनाका मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही रस्त्यावर दुकाने मांडली होती. परिणामी ग्राहक खरेदीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसत होते. वाढत्या महागाईचा फटका खरेदीला बसत आहे. प्रतिवर्षापेक्षा यावर्षी ग्राहकांची संख्या कमी असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दरही गगनाला भिडल्याने घरगुती फराळ करण्यापेक्षा विकत फराळ घेण्याकडे कल वाढला आहे. गरजेपुरता तयार फराळ घेवून दिवाळी साजरी केली जात आहे. बाजारपेठेत सध्या फटाक्यांचे विविध ठिकाणी स्टॉल लागले आहेत. आपला नेहमीचा व्यवसाय बाजूला ठेवून व्यापारी फटाक्यांचे स्टॉल समोर मांडून आहेत. तेथे खरेदीसाठी लहान मुले व त्यांच्या पालकांची गर्दी दिसते. धनत्रयोदशीचे औचित्य साधून कापड दुकानात कपड्यांची खरेदी सुरू होती. उद्या बुधवारी पहाटे अभ्यंगस्नान असल्याने बाजारात फुले, ‘कारटी’ यांची खरेदी सुरू होती. पर्यावरणस्नेही कंदील, मातीच्या पणत्या तसेच फॅन्सी पणत्या यांची खरेदी सुरू होती. लक्ष्मीपूजन गुरूवारी असले तरी बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. १०० रूपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू होती. पिवळ्या व केशरी झेंडूना विशेष मागणी दिसून येत होती. रत्नागिरीत आविष्कार संस्थेतील मतिमंद विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंनाही चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)दिवाळी सणानिमित्त रामआळी वाहतुकीस बंदरत्नागिरीतील रामआळी ही मोठी बाजारपेठ समजली जाते. दिवाळीसाठी वाढणारी ग्राहकांची गर्दी ध्यानी घेऊन रामआळी हा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आणखीन दोन दिवस गर्दीचा ओघ कायम राहणार असल्याने हा मार्ग यापुढेही बंद ठेवण्यात येणार आहे.रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत पणत्या, रांगोळ्यांना दिवाळीनिमित्त मागणी वाढली आहे. दीपावली हा दिव्यांचा सण मानला जातो. त्यामुळे दीपावलीच्या पाचही दिवसात अख्खं घर उजळून निघतं. त्यासाठी आता मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. पणत्याबरोबरच रांगोळ्या आणि झेंडूंच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. महिलावर्गाचीही खरेदीसाठी मोठी गर्दी आहे.