शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षारक्षक चार महिने मानधनाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारपट्टीची जबाबदारी असणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांवर गेले चार महिने विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारपट्टीची जबाबदारी असणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांवर गेले चार महिने विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या ६० सुरक्षा रक्षक कार्यरत असून, त्यांना चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक काेंडी हाेत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांचा समावेश आहे, तर ४३ मासळी उतरण्याची केंद्र आहेत. या किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षक गेले चार महिने मानधनाशिवाय काम करत आहेत. याबाबतीत वेळोवेळी मागणी करूनही शासन स्तरावर अद्यापही यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. सुरक्षारक्षकांचे मानधन नेहमीच उशिराने होत आहे. कधी चार महिने तर कधी सहा महिने अशा कालावधीमध्ये सुरक्षारक्षकांचे मानधन जमा होत असल्याने आर्थिक गणित बिघडत आहेत.

जिल्ह्यातील किनारपट्टीवर होत असलेली अवैध मासेमारी, परराज्यातील नौकांचे अतिक्रमण, पर्ससीन मासेमारी यासारख्या गोष्टीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरक्षारक्षकांना करावे लागते. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तसेच कोणत्याही पायाभूत सुविधा नसतानाही सुरक्षारक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत.आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग व बंदरे ही महत्त्वाची स्थानिक प्रश्नांच्या निगडित असलेले खाते आहे. त्यामुळे नवे मत्स्योद्योगमंत्री सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वास सुरक्षारक्षकांनी केला आहे. तसेच नवे मत्स्य आयुक्त प्रदीप पी यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे काम केल्यामुळे नव्या आयुक्तांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे नवीन मत्स्योद्योगमंत्री व नव्या मत्स्योद्योग आयुक्तांमुळे तरी सुरक्षारक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नियुक्तीपासूनच सुरक्षा रक्षक दुर्लक्षितसागरी सुरक्षा रक्षकांची कामगार कार्यालयाकडून निवड करण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये मैदानी परीक्षा झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. या भरतीपासूनच सुरक्षा रक्षकांना वेळेत मानधन मिळत नसल्याची बाब समाेर आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ६० तर काेकण किनारपट्टीवर ३०० सागरी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग