शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षारक्षक चार महिने मानधनाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारपट्टीची जबाबदारी असणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांवर गेले चार महिने विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारपट्टीची जबाबदारी असणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांवर गेले चार महिने विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या ६० सुरक्षा रक्षक कार्यरत असून, त्यांना चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक काेंडी हाेत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांचा समावेश आहे, तर ४३ मासळी उतरण्याची केंद्र आहेत. या किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षक गेले चार महिने मानधनाशिवाय काम करत आहेत. याबाबतीत वेळोवेळी मागणी करूनही शासन स्तरावर अद्यापही यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. सुरक्षारक्षकांचे मानधन नेहमीच उशिराने होत आहे. कधी चार महिने तर कधी सहा महिने अशा कालावधीमध्ये सुरक्षारक्षकांचे मानधन जमा होत असल्याने आर्थिक गणित बिघडत आहेत.

जिल्ह्यातील किनारपट्टीवर होत असलेली अवैध मासेमारी, परराज्यातील नौकांचे अतिक्रमण, पर्ससीन मासेमारी यासारख्या गोष्टीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरक्षारक्षकांना करावे लागते. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तसेच कोणत्याही पायाभूत सुविधा नसतानाही सुरक्षारक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत.आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग व बंदरे ही महत्त्वाची स्थानिक प्रश्नांच्या निगडित असलेले खाते आहे. त्यामुळे नवे मत्स्योद्योगमंत्री सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वास सुरक्षारक्षकांनी केला आहे. तसेच नवे मत्स्य आयुक्त प्रदीप पी यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे काम केल्यामुळे नव्या आयुक्तांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे नवीन मत्स्योद्योगमंत्री व नव्या मत्स्योद्योग आयुक्तांमुळे तरी सुरक्षारक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नियुक्तीपासूनच सुरक्षा रक्षक दुर्लक्षितसागरी सुरक्षा रक्षकांची कामगार कार्यालयाकडून निवड करण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये मैदानी परीक्षा झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. या भरतीपासूनच सुरक्षा रक्षकांना वेळेत मानधन मिळत नसल्याची बाब समाेर आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ६० तर काेकण किनारपट्टीवर ३०० सागरी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग