शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:14 IST

मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देसमाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळीबोललेले लिहिले जाते

मनोज मुळ्ये रत्नागिरी : मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या पाच-सात वर्षात विविध दूरसंचार कंपन्यांनी भाषेच्या या वापराचे प्रमाण लक्षात घेऊन संदेश पाठवण्यासाठीही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठीतून संदेश पाठवण्यासाठीच्या असंख्य प्रणाली भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत.अलिकडच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेली गोष्ट म्हणजे भ्रमणध्वनी. बोलण्यापेक्षा त्याचा वापर संदेशवहनासाठी अधिक होत आहे. भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाला, तेव्हापासूनच संदेशवहनाला अधिक महत्त्व आले. त्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी विविध योजना आणल्या. फक्त संदेश (एमएमएस) पाठवण्यासाठीच्या आकर्षक योजनांनी संदेशवहनाचे महत्त्व वाढले. नंतर व्हॉट्सअ‍ॅप दाखल झाल्यानंतर त्या माध्यमातून संदेश पाठवले जाऊ लागले.

सुरूवातीला इंग्रजी शब्द देवनागरी अर्थाने वापरले जाऊ लागले. पण संदेश वहनासाठी मातृभाषा उपलब्ध झाली तर त्याचा पर्यायाने इंटरनेटचा वापर अधिक वाढेल, याचा अंदाज आल्याने दूरसंचार कंपन्यांनी संदेशवहनासाठी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिले.या पर्यायाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झाला की, अनेक कंपन्यांनी, इतकेच नाही तर प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन) तयार करणाऱ्यांनीही अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळेच आजच्या घडीला अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीमध्ये ३0पेक्षा अधिक मराठी टंकलेखनाच्या प्रणाली उपलब्ध आहेत. ह्यगुगल प्लेस्टोअरह्णवर मराठी कीबोर्ड (कळफलक) शोधताना असंख्य पर्याय येतात. त्याचा जितका वापर वाढत आहे, तितका आधुनिकपणा त्यात आणला जात आहे. अनेक जोडशब्दांची उपलब्धता होत आहे.आता त्यात इतका आधुनिकपणा आला आहे की, बोललेले शब्द आपोआप टंकलिखित करणाऱ्याही अनेक मराठी प्रणाली आहेत. या पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आता संदेशवहनासाठी मराठीचा अधिकाधिक वापर होत असल्याचेही पाहायला मिळते. मराठीचा वापर वाढल्यामुळे त्यात सुधारणाही तेवढ्याच होत आहेत.बोललेले लिहिले जातेसंदेशवहनात मराठीचा वापर वाढल्यामुळे आता त्यात प्रयोगही खूप होत आहेत. भ्रमणध्वनीवर बोटाने लिहिलेली अक्षरे टंकलिखित नमुन्यात तयार करण्याची प्रणालीही आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी टंकलेखन करावे लागत नाही. बोललेले शब्द उमटत जातात आणि संदेश तयार होतो.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनRatnagiriरत्नागिरी