शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज शांत आहे म्हणजे सहनशील आहे, असे समजू‌ नये : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. ...

रत्नागिरी : सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. याच सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की समाज शांत आहे म्हणजे तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा या सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणे बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटले नाही, कारण सरकार असेपर्यंत आरक्षण मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही नव्हते. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे गेल्यावेळीच आपण सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा शरद पवार असोत त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. ते कधीही मराठ्यांच्या बाजूने बोलले नाहीत, असे ते म्हणाले.

सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना रस्त्यावर आणण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असं सांगतानाच ते पुढे म्हणाले की, मराठा समाज शांत आहे याचा अर्थ असा नव्हे की, तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना लापायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा; पण तरुणांच्या जिवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही नीलेश राणे यांनी दिला आहे.