शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

Maratha Kranti Morcha :आरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेल, राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:43 IST

शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेलमराठा सेवा संघाच्यावतीने राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन

राजापूर : मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असताना मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांचे शासन कमालीचे उदासिन असून, शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. यापुढे होणाऱ्या आंदोलनांदरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या जोरदार आंदोलने सुरु असून, शासनाने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यात जोरदार आंदोलने सुरु आहेत. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी निदर्शने झाली. आरक्षण मागणीसाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक मूक मोर्चे काढून सनदशीर मार्गाने शासनाकडे मागणी केली होती. पण, शासनासह मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत उदासिनता दाखविली. परळी (बीड) येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीबाबत केलेल्या विधानामुळे मराठा तरुण दुखावला गेला असून, नैराश्य भावनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती. त्याला शासन जबाबदार आहे, असा आरोप देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.शासनाने आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करताना योग्य भूमिका घेतली गेली नाही तर आमच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार प्रयत्न करु, त्यावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा त्या निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRatnagiriरत्नागिरी