शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एकाच दगडात टिपले अनेक पक्षी

By admin | Updated: March 7, 2017 00:02 IST

सेनेची खेळी : जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

रत्नागिरी : रत्नागिरीचे सदस्य उदय बने यांना सेनेने जिल्हा परिषदेत गटनेतेपदी नियुक्ती दिल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी रत्नागिरी तालुक्यातून इच्छुक असलेल्यांचे पत्ते आपोआप कट झाले आहेत. यामुळे संगमेश्वर तालुक्यातील सेनेच्या रचना महाडिक यांचा अध्यक्ष बनण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. पुढील सव्वा वर्षासाठी लांजा तालुक्यातील सेनेच्या स्वरुपा साळवी यांना अध्यक्षपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सेना नेत्यांनी एका दगडात अनेक पक्षी टिपल्याची चर्चा आता रंगली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेला ५५ पैकी ३९ जागा मिळाल्या. सेनेला जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणत्या तालुक्याचा होणार, कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्कंठा आहे. शिवसेनेतील विजयी उमेदवारांमध्ये या पदासाठी मोठी स्पर्धा आहे. रत्नागिरी तालुक्यात सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्व दहा जागांवर विजय संपादन केला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यालाच हे पद मिळावे, यासाठी येथील काही नेत्यांकडून पक्षप्रमुखांकडे आग्रह धरण्यात येत आहे.या पदासाठी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य देवयानी झापडेकर, मानसी साळवी तसेच अन्य महिला सदस्यांची नावेही चर्चेत होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या सर्व ७ जागा जिंकणाऱ्या संगमेश्वर तालुक्याचाही या पदासाठी दावा होता. तेथील कसबा गटातून विजयी झालेल्या जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. निवडणुकीच्या आधीच तशी तयारी सेनेकडून करण्यात आली होती. कसबा गटात राजेश मुकादम यांनी सेनेत मोठे बंड करूनही ही जागा जीवाचे रान करून जिंकण्यात सेनेला यश आले. मात्र, रत्नागिरी तालुक्यात सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली. मात्र, उदय बने यांची गटनेतेपदी निवड करून या मोर्चेबांधणीला सेनेच्या नेत्यांनी छेद दिला आहे. बने यांच्या पुढील काळातील अध्यक्ष बनण्याच्या महत्वाकांक्षेचे पंखही यामुळे कापले गेल्याची चर्चा आहे. या राजकीय खेळीमुळे पहिल्या अडीच वर्षासाठी रत्नागिरी तालुक्याला अध्यक्षपद मिळण्याची आशा मावळल्यात जमा आहे. दक्षिण रत्नागिरीत शिवसेनेचे चांगले वर्चस्व असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत उत्तर रत्नागिरीत अंतर्गत गटबाजीचा फटका सेनेला या निवडणुकीत बसला आहे. तरीही दापोली तालुक्यातील सेनेच्या जिल्हा परिषद सदस्य चारुता कामतेकर यांना अध्यक्षपद देण्याची राजकीय व्यूहरचना काही बड्या नेत्यांनी आखली आहे. मात्र, सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात तरी उत्तर रत्नागिरीचे अध्यक्षपदाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता दुरावली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यांनंतर सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य विजयी करणाऱ्या लांजा तालुक्यालाही पुढील सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद दिले जाणाची शक्यता आहे. या पदासाठी सेनेच्या स्वरुपा साळवी यांचे नावही चर्चेत आहे. लांज्याला सव्वा वर्षे हे पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)