शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

लाॅकडाऊन काळातही आंबा वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने कडक निर्बंधातही आंबा वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यातही वाशी बाजारात आंब्याच्या खरेदीविक्रीच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने त्यालाही सुसूत्रता आली आहे. त्याच वेळी बागायतदारांनी आंब्याच्या थेट विक्रीवर भर दिला असून, ती वाहतूकही सुरळीत आहे.

हापूसच्या विक्रीसाठी बहुतांश शेतकरी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून आहेत. गतवर्षी लाॅकडाऊन काळात वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने खरेदी विक्रीचे व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांना खासगी विक्री करावी लागली. या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीविक्री व्यवस्था करताना गर्दी टाळण्यासाठी दोन सत्रांत विभागणी केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत वाशी मार्केटमध्ये पोहोचलेल्या वाहनातील आंब्याची विक्री सकाळी नऊ वाजता सुरू होते. सकाळी सातनंतर आलेल्या वाहनातील आंबा पेट्यांची विक्री दुपारनंतर होते. शेतकरीही त्याप्रमाणे नियोजन करून आंबा काढणी, पॅकिंग प्रक्रिया वेळेवर पूर्ण करीत आहेत.

गुढीपाडव्यापासून वाशी मार्केटमधील आवक वाढली आहे. दररोज ३४ ते ३५ हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. १,५०० ते ३,५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

आंबा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने आंबा काढणीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना कडक संचारबंदीतून वगळले आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय पासचे निर्बंधही हटविण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदा बागायतदारांसमाेर समस्या नाहीत. कोरोनाचे संकट, शिवाय उत्पादन कमी असतानाही आंबा काढणी, विक्री, तसेच वाहतूक व्यवस्थेची समस्या तरी यंदा नाही.