शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:29 IST

पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधुके, गारठा वाढला, अखेर पाऊस थांबलाआता प्रतीक्षा आंबा - काजू कलमे मोहोरण्याची

रत्नागिरी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.अद्याप जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे कलमांना पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ८० टक्के कलमांना सध्या पालवी आहे. पालवी जून होण्यासाठी किमान ४० ते ४५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर मोहोर प्रक्रिया सुरु होते. गेले दोन दिवस थंडी सुरु झाल्यामुळे जानेवारीमध्ये मोहोर प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

जानेवारीमध्ये पारा प्रचंड खाली येतो. नीचांक हवामानामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. बहुतांश मोहोरावर फळधारणा होत नाही. शिवाय पुनर्मोहोरदेखील होत असल्याने या हंगामात मोहोर आला तर हे दुहेरी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागणार आहे. मोहोर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन कीटक नाशकांची फवारणी करावी लागणार आहे.आॅक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन कलमांच्या मुळांना ताण देऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. मतलई वाºयामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होतो, थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने होते. मात्र, अद्याप थंडी फारशी नसल्याने मोहोर प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सध्या २० टक्के उर्वरित कलमांना थंडीमुळे मोहोर येण्याची शक्यता आहे. परंतु पालवी सुरु झाल्यास हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.जास्त थंडीमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे थ्रीप्स, बुरशी, तुडतुडासारख्या कीटकांचा प्रभाव वाढू शकतो. गतवर्षीदेखील थ्रीप्स व तुडतुड्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. यावर्षी नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्यामुळे खर्च वाढतो. सध्या बागायतदारांनी पालवीचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे. 

हवामानावर अवलंबून असलेल्या आंबा पिकाचा हंगाम यावर्षी एक ते दीड महिना उशिरा होणार आहे. सध्या सर्वत्र पालवी आहे. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्यामुळे हा आंबा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता असून, एकाचवेळी आंबा बाजारात आला तर दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत प्रचंड खर्च केला जातो, त्या तुलनेत आंब्याला दर प्राप्त होत नसल्याने शेतकरी बांधव दरवर्षी आर्थिक दुष्टचक्रात सापडत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकावर परिणाम होत असल्याने आंबा पीक खर्चिक बनले आहे.- एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान