शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

आंबा, काजूला नुकसानभरपाई हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत ...

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कोकण विभाग खरीप हंगाम नियोजन पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कोकण दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील रत्नागिरी कृषी विभागातर्फे आयोजित 'विकेल ते पिकेल' या अभियानांतर्गत उभारलेल्या कलिंगड विकी स्टॉलला भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये आमदार साळवी यांनी कोकणाचे काही प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदाराचे झालेले नुकसान तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे व कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला कमीत कमी १५० ते १६० रुपये दर मिळण्याची मागणी आमदार साळवी यांनी केली.

यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त संचालक डॉ. शिंदे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्रभारी उपविभागीय अधिकारी बनसोडे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर, राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर गटविकास अधिकारी पाटील, राजापूर तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, राजापूर सभापती प्रमिला कानडे, लांजा सभापती मानसी आंबेकर उपस्थित होते.