शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजूला नुकसानभरपाई हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत ...

राजापूर : अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला योग्य किंमत मिळावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कोकण विभाग खरीप हंगाम नियोजन पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कोकण दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील रत्नागिरी कृषी विभागातर्फे आयोजित 'विकेल ते पिकेल' या अभियानांतर्गत उभारलेल्या कलिंगड विकी स्टॉलला भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये आमदार साळवी यांनी कोकणाचे काही प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदाराचे झालेले नुकसान तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे व कोकणातील शेतकऱ्यांच्या काजू बीला कमीत कमी १५० ते १६० रुपये दर मिळण्याची मागणी आमदार साळवी यांनी केली.

यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त संचालक डॉ. शिंदे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्रभारी उपविभागीय अधिकारी बनसोडे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर, राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर गटविकास अधिकारी पाटील, राजापूर तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, राजापूर सभापती प्रमिला कानडे, लांजा सभापती मानसी आंबेकर उपस्थित होते.