शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मंडल अधिकारी, तलाठ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सातबारा उताºयावर नाव टाकण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी प्रदीप राजाराम सावंत (तरवळ) व तलाठी प्रल्हाद ज्ञानोबा पोपलाईन (५८, यश अपार्टमेंट, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुरुवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी भैरू अंतू तळेकर यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सातबारा उताºयावर नाव टाकण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी प्रदीप राजाराम सावंत (तरवळ) व तलाठी प्रल्हाद ज्ञानोबा पोपलाईन (५८, यश अपार्टमेंट, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुरुवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी भैरू अंतू तळेकर यांनी फिर्याद दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. ४ मार्च २०१७ ला हा प्रकार घडला होता. तक्रारदार दीपक तळेकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंद करण्यासाठी प्रदीप सावंत व प्रल्हाद पोपलाईन यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त आठ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबत तळेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सखोल तपासणी केली. त्यातील साक्षीदार तपासले. या तपासणीत आठ हजारपैकी तीन हजार रुपये या दोन्ही आरोपींनी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.लाच मागितली तरीही गुन्हालाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यावर विस्तृत शहानिशा करण्यात आली. याच पद्धतीने याआधीही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ लाच घेताना पकडलेल्याच नाही तर तक्रारीची शहानिशा करून त्यात तथ्य आढळेल, अशा प्रकरणांमध्येही आता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गुन्हा दाखल करू लागले आहे.