शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

उद्याच्या भविष्याला कुपोषणाची बाधा

By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST

रत्नागिरी जिल्हा : ३१६ बालकांची निरोगी जगण्याची धडपड

रत्नागिरी : जिल्ह्यात ३१६ मुले कुपोषणग्रस्त असून, त्यांच्यावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत उपाय सुरु आहेत. वजन वाढवून त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी धडपड सुरु आहे. आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित होतात. जन्मत: कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्युमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडिनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील मुले कुपोषित असली तरी हे प्रमाण अल्प आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ७२ सॅम (अति कुपोषित) आणि २४४ मॅम (मध्यम कुपोषित) बालकांचा समावेश आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये ही कुपोषित बालके आहेत, त्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी त्या बालकांची तपासणी करतात. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत अंगणवाडी स्तरावरील ग्राम बालविकास केंद्रांमध्ये कुपोषित बालकांच्या आरोग्याची ३० दिवस विशेष काळजी घेण्यात येते. या कालावधीत कुपोषित बालकांचे दर आठवड्याला वजन घेण्यात येते. (शहर वार्ताहर)