शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महायुतीत ‘महा’फूट

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

रत्नागिरी पालिका : महायुतीच्या सत्तेला बंडखोरीचे ग्रहण लागणार?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये उभी फूट पडल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेगळीच कलाटणी लागली आहे़ या फुटीमुळे भाजपाच्या सहा नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली आहे़रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीने विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे़ त्यासाठी मुंबईत शिवसेनेबरोबर भाजपाच्या नेत्यांनी वाटाघाटी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अशोक मयेकर यांना आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने महायुतीतर्फे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली़ अशोक मयेकर यांना पुन्हा नगराध्यक्षपद देण्याबाबत भाजपाच्या ६ नगरसेवकांकडून तीव्र विरोध होता़ त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी आज आपला वेगळा गट तयार केला़ त्यासाठी या नगरसेवकांनी एक बैठक घेऊन नगरसेवक महेंद्र मयेकर यांना गटप्रमुख म्हणून नियुक्त केले़ त्यानंतर महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ आज सायंकाळी उशिरा भाजपाच्या नगरसेविका संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, प्रज्ञा भिडे, दिपा आगाशे, पल्लवी पाटील आणि नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले़ त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे़ नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतर्फे अशोक मयेकर, काँग्रेस आघाडीच्यावतीने नगरसेवक सुदेश मयेकर, महायुतीतील शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये आणि भाजपाचे नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ महायुतीमध्ये नगरसेवक उमेश शेट्ये यांनी बंडखोरी करतानाच महेंद्र मयेकर यांनी थेट अशोक मयेकर यांनाच आवाहन दिले आहे़ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे १५, भाजपाचे ८ असे महायुतीचे २३ नगरसेवक आणि राष्ट्रवादी ७ व काँग्रेसचे १ असे काँगे्रेस आघाडीचे ८ असे पक्षीय बलाबल आहे़ यामध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली़ शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये यांच्याबरोबर त्यांच्याच पक्षातील २ नगरसेवक असल्याने महायुतीचे आणखी ३ नगरसेवक फुटले़ त्यामुळे आता महायुतीकडे केवळ १४ नगरसेवक राहिले आहेत़ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये काँग्रेस आघाडीचे ८, भाजपाचे फुटीर ६ नगरसेवक आणि शिवसेनेचे ३ असे एकूण संख्याबल १७ झाले आहे़ अशोक मयेकर यांना शह देण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीचे नगरसेवक यांनी एकजूट केल्यास युतीच्या सत्तेला मोठा धक्का बसणार आहे़ (शहर वार्ताहर)रत्नागिरीत चार अर्ज दाखलनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आली होती. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ उमेश शेट्ये यांचाच अर्ज दाखल झाला असून भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर आणि राष्ट्रवादीतर्फे सुदेश मयेकर या तीन ‘मयेकर’ अर्ज आज दाखल झाले आहेत.