शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील महावितरणची यंत्रणा पावसामुळे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:49 IST

१३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प

 आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. २२ : तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने वारे व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ केव्हीच्या वाहिन्या नादुरूस्त झाल्यामुळे १३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. महावितरणच्या यंत्रणेला ५ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले तरी ८ हजार १०३ ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

कोतवडे येथील ११ केव्हीची वाहिनी सकाळी ९.४९ वाजता बंद पडली होती. दुपारी ३ वाजता ती सुरळीत करण्यात आल्यामुळे परिसरातील ४ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला. संगमेश्वर येथील धामणी वाहिनी सकाळी ७.४५ वाजता ठप्प झाली. मात्र, ९.२५ वाजता दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

मार्गताम्हाणे येथील वाहिनी सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद होती. लोटे येथील ११ केव्ही वाहिनी सकाळी ७.१० वाजता बंद पडल्यामुळे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लोटे येथील दुसरी ११ केव्हीची वाहिनीही ७.१० वाजताच बंद पडली. त्यामुळे ६०३ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.

राजापूर तालुक्यातील धारतळे येथील वाहिनी सकाळी १०.५५ वाजता बंद पडल्यामुळे ७०० ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. नाटे वाहिनी दुपारी १.२५ वाजल्यापासून बंद असल्यामुळे ३५०० ग्राहकांना विजेशिवाय राहावे लागले. दापोली तालुक्यातील वणौशी गावातील ११ केव्ही वाहिनी संध्याकाळी ४ वाजता नादुरूस्त झाल्यामुळे १३०० ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप बंद आहे. एकूण ८ हजार १०३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बीएसएनएलचा बोजवारा

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात गेले पाच दिवस बीएसएनएलची सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. त्यामुळे परिसरातील ४० गावांना याचा फटका बसला असून, संपर्क तुटला आहे. मागील काही महिने सातत्याने या सेवेत व्यत्यय येत आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराबाबत जनतेमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. ही सेवा तातडीने सुरु न झाल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा माजी जिल्हा उपप्रमुख अशोक सक्रे यांनी दिला आहे.

गेल्या शुक्रवारी पाचलमधील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील सेवा पूर्णत: खंडित झाली आहे. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. खंडित सेवेमुळे संपर्कासह इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्याचा मोठा फटका ४० गावातील ग्राहकांना बसत आहे. मागील पाच दिवसात ही सेवा पूर्ववत करण्यास अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. बीएसएनएलची सेवा तातडीने सुरळीत न केल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख अशाक सक्रे यांनी दिला आहे.

लांजात वादळी वाऱ्याने लाखोंचे नुकसान

लांजा : गेले तीन दिवस पडलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी या पावसाने मोठी हानी केली आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तालुक्यात गेले दोन दिवसांत विविध ठिकाणी पडझड झाली आहे. तालुक्यातील गवाणे गावाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. याठिकाणी अनेकांचे नुकसान झाले आहे.

तुकाराम देऊ रेवाळे यांचे घर कोसळून अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. सुलोचना दत्ताराम गुरव यांच्या घरावर झाड कोसळून वीस हजारांचे नुकसान झाले आहे. भिकाजी सखाराम करंबेळे, गणपत गोविंद करंबेळे, रत्नू करंबेळे, सिताराम करंबेळे, सुरेश मोहिते, विठ्ठल रेवाळे, बाळकृष्ण माटल, दत्ताराम माटल, सीताराम कांबळे, गणपत करंबेळे यांच्या घरांच्या छपराचे नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून इतरही अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.