शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

रत्नागिरीतील महावितरणची यंत्रणा पावसामुळे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:49 IST

१३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प

 आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. २२ : तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने वारे व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ केव्हीच्या वाहिन्या नादुरूस्त झाल्यामुळे १३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. महावितरणच्या यंत्रणेला ५ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले तरी ८ हजार १०३ ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

कोतवडे येथील ११ केव्हीची वाहिनी सकाळी ९.४९ वाजता बंद पडली होती. दुपारी ३ वाजता ती सुरळीत करण्यात आल्यामुळे परिसरातील ४ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला. संगमेश्वर येथील धामणी वाहिनी सकाळी ७.४५ वाजता ठप्प झाली. मात्र, ९.२५ वाजता दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

मार्गताम्हाणे येथील वाहिनी सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद होती. लोटे येथील ११ केव्ही वाहिनी सकाळी ७.१० वाजता बंद पडल्यामुळे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लोटे येथील दुसरी ११ केव्हीची वाहिनीही ७.१० वाजताच बंद पडली. त्यामुळे ६०३ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.

राजापूर तालुक्यातील धारतळे येथील वाहिनी सकाळी १०.५५ वाजता बंद पडल्यामुळे ७०० ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. नाटे वाहिनी दुपारी १.२५ वाजल्यापासून बंद असल्यामुळे ३५०० ग्राहकांना विजेशिवाय राहावे लागले. दापोली तालुक्यातील वणौशी गावातील ११ केव्ही वाहिनी संध्याकाळी ४ वाजता नादुरूस्त झाल्यामुळे १३०० ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप बंद आहे. एकूण ८ हजार १०३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बीएसएनएलचा बोजवारा

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात गेले पाच दिवस बीएसएनएलची सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. त्यामुळे परिसरातील ४० गावांना याचा फटका बसला असून, संपर्क तुटला आहे. मागील काही महिने सातत्याने या सेवेत व्यत्यय येत आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराबाबत जनतेमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. ही सेवा तातडीने सुरु न झाल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा माजी जिल्हा उपप्रमुख अशोक सक्रे यांनी दिला आहे.

गेल्या शुक्रवारी पाचलमधील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील सेवा पूर्णत: खंडित झाली आहे. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. खंडित सेवेमुळे संपर्कासह इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्याचा मोठा फटका ४० गावातील ग्राहकांना बसत आहे. मागील पाच दिवसात ही सेवा पूर्ववत करण्यास अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. बीएसएनएलची सेवा तातडीने सुरळीत न केल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख अशाक सक्रे यांनी दिला आहे.

लांजात वादळी वाऱ्याने लाखोंचे नुकसान

लांजा : गेले तीन दिवस पडलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी या पावसाने मोठी हानी केली आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तालुक्यात गेले दोन दिवसांत विविध ठिकाणी पडझड झाली आहे. तालुक्यातील गवाणे गावाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. याठिकाणी अनेकांचे नुकसान झाले आहे.

तुकाराम देऊ रेवाळे यांचे घर कोसळून अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. सुलोचना दत्ताराम गुरव यांच्या घरावर झाड कोसळून वीस हजारांचे नुकसान झाले आहे. भिकाजी सखाराम करंबेळे, गणपत गोविंद करंबेळे, रत्नू करंबेळे, सिताराम करंबेळे, सुरेश मोहिते, विठ्ठल रेवाळे, बाळकृष्ण माटल, दत्ताराम माटल, सीताराम कांबळे, गणपत करंबेळे यांच्या घरांच्या छपराचे नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून इतरही अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.