शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

राज्य शासनाविरोधात महायुतीचा ‘एल्गार’

By admin | Updated: June 3, 2014 02:03 IST

महायुतीतर्फे सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ए. पी. एल. धारकांना अद्याप धान्यपुरवठा नाही, या दोन प्रमुख मुद्द्यासंह अन्य मागण्यांसाठी महायुतीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. आंबा बागायतदारांना भरपाई मिळालीच पाहिजे, रेशन दुकानावर धान्य मिळालेच पाहिजे याचबरोबर लोकसभा झाकी है, विधानसभा बाकी है, एक धक्का और दो आघाडी शासन तोड दो, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जयस्तंभ परिसर दणाणून सोडला. भाजप, शिवसेना आणि आर. पी. आय. (आठवले गट) महायुतीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यात भाजपचे प्रवक्ते बाळ माने, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रवक्ते उमेश शेट्ये, शहराध्यक्ष संजय पुनसकर, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, प्रा. नाना शिंदे, तसेच रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळ माने, सचिन वहाळकर, प्रा. नाना शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाच्या समाप्तीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे तसेच तहसिलदार मारूती कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश मुकादम, शिक्षण सभापती सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष बाबा बार्इंग, आंबा बागायतदार सुर्यकांत सावंत, विजय बेहेरे, राजू जाधव, उदय बने, मुन्ना चवंडे, सभापती अनुष्का खेडेकर, उपसभापती योगेश पाटील, शरयू गोताड, पल्लवी पाटील, राजश्री शिवलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)