शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

दरवाढीच्या ‘शॉक’मधून महाराष्ट्र मुक्त

By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST

धोरणामुळे दिलासा : निवडणुका संपताच पाच राज्यांत वीज दरवाढीचा झटका

रत्नागिरी : लोकसभा निवडणुका संपताच देशातील पाच राज्यांत वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राने दरवाढीबरोबरच ग्राहकांना त्या वाढीएवढेच अनुदानही जाहीर केल्याने राज्यातील ग्राहकांना सुटकेचा दिलासा मिळाला आहे. निवडणुकांमुळे अनेक राज्यांनी दरवाढ थोपवून ठेवली होती. गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांनी वीज दरवाढीचे प्रस्ताव सादर केले नव्हते. अन्य राज्यांत अद्याप नवीन वीजदर लागू करण्यात आले नसले तरी गुजरात व महाराष्ट्रात मात्र ते लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने २० टक्के दरवाढ करताना घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी ग्राहकांना दर २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून नवीन दर जाहीर केले आहेत. मात्र त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे दरवाढीचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना सहन करावा लागणार नाही. विभागनिहाय वीज वापराचा विचार केल्यास उत्तर क्षेत्रातील राज्यांसाठी ४१ हजार २२२ मेगावॅट, पश्चिमी राज्यांसाठी ४१ हजार ४५४ मेगावॅट, दक्षिणी राज्यांसाठी ३९ हजार ७९८ मेगावॅट, पूर्व राज्यासाठी १६ हजार ३२७ मेगावॅट, तर उत्तरपूर्व राज्यांसाठी २ हजार १९७ मेगावॅट विजेची मागणी होते. संपूर्ण देशासाठी १ लाख ४० हजार ९९८ मॅगावॅट वीज लागते. पश्चिम बंगालमध्ये २ पैसे, कर्नाटकमध्ये ६६ पैसे, तर आंध्रप्रदेशमध्ये ५० पैसे ते १ रूपये २० पैसेने दर वाढले आहेत. (प्रतिनिधी)