शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

दरवाढीच्या ‘शॉक’मधून महाराष्ट्र मुक्त

By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST

धोरणामुळे दिलासा : निवडणुका संपताच पाच राज्यांत वीज दरवाढीचा झटका

रत्नागिरी : लोकसभा निवडणुका संपताच देशातील पाच राज्यांत वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राने दरवाढीबरोबरच ग्राहकांना त्या वाढीएवढेच अनुदानही जाहीर केल्याने राज्यातील ग्राहकांना सुटकेचा दिलासा मिळाला आहे. निवडणुकांमुळे अनेक राज्यांनी दरवाढ थोपवून ठेवली होती. गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांनी वीज दरवाढीचे प्रस्ताव सादर केले नव्हते. अन्य राज्यांत अद्याप नवीन वीजदर लागू करण्यात आले नसले तरी गुजरात व महाराष्ट्रात मात्र ते लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने २० टक्के दरवाढ करताना घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी ग्राहकांना दर २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून नवीन दर जाहीर केले आहेत. मात्र त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे दरवाढीचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना सहन करावा लागणार नाही. विभागनिहाय वीज वापराचा विचार केल्यास उत्तर क्षेत्रातील राज्यांसाठी ४१ हजार २२२ मेगावॅट, पश्चिमी राज्यांसाठी ४१ हजार ४५४ मेगावॅट, दक्षिणी राज्यांसाठी ३९ हजार ७९८ मेगावॅट, पूर्व राज्यासाठी १६ हजार ३२७ मेगावॅट, तर उत्तरपूर्व राज्यांसाठी २ हजार १९७ मेगावॅट विजेची मागणी होते. संपूर्ण देशासाठी १ लाख ४० हजार ९९८ मॅगावॅट वीज लागते. पश्चिम बंगालमध्ये २ पैसे, कर्नाटकमध्ये ६६ पैसे, तर आंध्रप्रदेशमध्ये ५० पैसे ते १ रूपये २० पैसेने दर वाढले आहेत. (प्रतिनिधी)