शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

Maharashtra Assembly Election 2019 : गरमागरमीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:18 IST

एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.

ठळक मुद्देऑक्टोबर हीटचा तडाखा, कार्यकर्त्यांसह नेतेही झाले घामाघूमलोकसभेप्रमाणेच विधानसभेचा प्रचारही घाम फोडणारा

मनोज मुळये रत्नागिरी : एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.गत सप्ताहात पावसाने हजेरी लावली असली तरी या आठवड्यात पावसाची शक्यता कमीच आहे. आता ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढू लागला आहे. १४पासून सुरू झालेल्या या आठवड्यात तापमानाचा पारा ३० अंशाच्या पुढेच गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या मानाने हे तापमान अंगाची लाहीलाही करणारे आहे.उन्हाच्या कडाक्यातच उमेदवारांचा प्रचार वाढत चालला आहे. २१ रोजी मतदान असल्याने आता मोजकेच दिवस हातात राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारानेही टोक गाठले आहे. यावेळी सर्वच पक्षांनी जाहीर सभांपेक्षा वाडीवाडीत ग्रामस्थांना जाऊन भेटण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे या उन्हाचा चांगलाच सामना उमेदवारांना करावा लागत आहे. उष्णता वाढल्याने काही उमेदवारांना खोकल्याचाही त्रास सुरू झाला आहे. मात्र औषधोपचार घेत प्रचाराला गती दिली जात आहे.रात्री दहा वाजता प्रचार संपल्यानंतरही कार्यालयात बसून दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रचाराचा आढावा घेणे आणि दुसऱ्या दिवशीचे नियोजन करणे सुरू असते. त्यामुळे पुरेशी विश्रांती नाही, अशी स्थितीही उमेदवारांची झाली आहे.दोन दिवस तापमान ३४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यातही सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत तापमान ३१ अंशाहून जास्त असेल. या वेळात प्रचाराची तीव्रता वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे.समुद्रकिनाऱ्यावर असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच घाम अधिक येतो आणि त्याने थकवा लवकर येतो. आता प्रचार करणाऱ्यांसमोर हाच प्रश्न मोठा आहे. लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात झाल्या होत्या. तेव्हाही उन्हाच्या झळा अशाच वाढल्या होत्या. अर्थात त्यावेळी तापमान ४० अंशापेक्षा अधिक होते. त्यामानाने आता उष्मा कमी आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRatnagiriरत्नागिरी