शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

रत्नागिरीत प्रथमच एम. एस. कर्णिका नावाचे प्रवासी जहाज -- जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:44 IST

महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रवाशांना मालगुंडसह गणपतीपुळे परिसराची सफर

रत्नागिरी : ह्यएम. एस. कर्णिकाह्ण नावाचे प्रवासी जहाज गुरूवारी पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल झाले. तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे सकाळी आलेले हे जहाज सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. यात ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवासी होते.रत्नागिरी बंदरे समुहातील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांच्या लावगण येथील बंदर संकुलात जलेश कंपनीचे प्रवासी जहाज ह्यएम. एस. कर्णिकाह्ण गुरूवारी सकाळी ८ वाजता ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवाशांसह यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे दाखल झाले. महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर कॅ. उगलमुगले यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने प्रवासी जहाज वाहतुकीच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.बुधवारी रात्री मुंबईहून निघाले आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता आंग्रे पोर्ट जयगड येथे दाखल झाले. या जहाजाची लांबी २४३ मीटर आणि रूंदी ३२.२५ मीटर आहे. या जहाजामध्ये प्रवाशांसाठी स्वीमिंगपूल, भोजनाकरिता हॉटेल व रेस्टॉरंट, रूम्स, लहान मुलांसाठी खेळणी, जीम व स्लाईड आदी सुविधा आहेत. या बोटीमधून आलेल्या सर्व प्रवाशांना गणपतीपुळे व मालगुंडचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर ही प्रवासी बोट सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpassengerप्रवासी