शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

रत्नागिरीत प्रथमच एम. एस. कर्णिका नावाचे प्रवासी जहाज -- जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:44 IST

महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रवाशांना मालगुंडसह गणपतीपुळे परिसराची सफर

रत्नागिरी : ह्यएम. एस. कर्णिकाह्ण नावाचे प्रवासी जहाज गुरूवारी पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल झाले. तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे सकाळी आलेले हे जहाज सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. यात ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवासी होते.रत्नागिरी बंदरे समुहातील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांच्या लावगण येथील बंदर संकुलात जलेश कंपनीचे प्रवासी जहाज ह्यएम. एस. कर्णिकाह्ण गुरूवारी सकाळी ८ वाजता ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवाशांसह यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे दाखल झाले. महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर कॅ. उगलमुगले यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने प्रवासी जहाज वाहतुकीच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.बुधवारी रात्री मुंबईहून निघाले आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता आंग्रे पोर्ट जयगड येथे दाखल झाले. या जहाजाची लांबी २४३ मीटर आणि रूंदी ३२.२५ मीटर आहे. या जहाजामध्ये प्रवाशांसाठी स्वीमिंगपूल, भोजनाकरिता हॉटेल व रेस्टॉरंट, रूम्स, लहान मुलांसाठी खेळणी, जीम व स्लाईड आदी सुविधा आहेत. या बोटीमधून आलेल्या सर्व प्रवाशांना गणपतीपुळे व मालगुंडचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर ही प्रवासी बोट सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpassengerप्रवासी